Air India : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार!

'या' कारणांमुळे कंपनीचे विलीनीकरण


मुंबई : टाटा उद्योग (TATA Group) समूहाच्या अंतर्गत विमानसेवा पुरवणाऱ्या एअर इंडिया (Air India) आणि विस्तारा (Vistara) या दोन्ही कंपन्या नेहमीच चर्चेत असतात. सध्या आर्थिक नुकसान होत असल्यामुळे या दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण सुरु आहे. मात्र या विलीनीकरणाचा फटका कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे तब्बल ६०० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर सध्या टांगती तलवार (Jobless) उभारली गेली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, तोट्यात चाललेल्या या दोन्ही विमान कंपन्या टाटा समूहाच्या मालकीच्या आहेत. त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या २३००० पेक्षा जास्त आहे. विमान वाहतूक व्यवसायामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्या विमान कंपन्यांचे विलीनीकरण करण्याच्या प्रक्रियेवर काम करत आहे. ही प्रक्रिया सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला पूर्ण होऊ शकते. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाधित कर्मचाऱ्यांची नेमकी संख्या कळेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.



कर्मचाऱ्यांना मिळणार इतर गटात नोकरी


विलीनीकरण प्रक्रियेचा परिणाम ६०० कर्मचाऱ्यांवर होण्याची अपेक्षा आहे. मात्र नोकरी धोक्यात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना एअर इंडियासह टाटा समूहाच्या इतर कंपन्यांमध्ये रोजगार देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जे कर्मचारी कोणत्याही गटाशी जुळवून घेऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी स्वेच्छा सेवानिवृत्ती योजना म्हणजेच VRS सुरू केले जाईल.


दरम्यान, एअरलाइन्स कर्मचाऱ्यांची निवड ही त्यांचा पूर्वीचा अनुभव, कामगिरी आणि इतर बाबी लक्षात घेऊन केली जात आहे. या विलीनीकरण प्रक्रियेचा दोन्ही एअरलाइन्सच्या क्रू मेंबर्स आणि पायलटवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यासोबत एअर इंडिया एक्सप्रेस आणि एआयएक्स कनेक्ट यांचेही विलीनीकरण होणार आहे.

Comments
Add Comment

'पाकिस्तानचा देशव्यापी घातपाताचा कट उधळला; दिल्ली स्फोटावर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

मुंबई : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत दहशतवादी हल्ला करुन अनेक निरपराध

हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवाद्यांच्या कारवायांना लागली घरघर, एकाचवेळी ३७ नक्षलवादी आले शरण

नवी दिल्ली : शरण या आणि नक्षलवाद्यांच्या भावी योजनांची तसेच तयारीची माहिती देऊन सरकारी योजनांचा लाभ घ्या अथवा

‘तिरुपती’च्या २० कोटी लाडूंसाठी वापरले ‘भेसळयुक्त’ तूप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): तिरुपती मंदिरात भेसळयुक्त तूप वापरून अंदाजे २० कोटी लाडू तयार करण्यात आले होते.

दिल्ली क्राईम ब्रँचची धडक कारवाई, आयएसआयशी संबंधित ४ आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करांना अटक

नवी दिल्ली: दिल्ली गुन्हे शाखेने पाकिस्तानी आयएसआयशी जोडलेल्या आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करीच्या टोळीतील चार

कोट्यावधींच्या सायबर फसवणुकीचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफाश; गुन्हेगारीचे मुळ उद्ध्वस्त करणाच्या हेतूने कारवाई

मुंबई : दिल्ली पोलिसांनी गेल्या ४८ तासांत मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हेगारीविरोधात मोहीम राबवत शेकडो फसवणूक

भारतात नवीन कामगार कायदे लागू, आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल! काय होणार लाभ, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: केंद्रीय श्रममंत्री मनसूख मांडवीय यांनी देशात चार नवीन कामगार कायदे लागू करत असल्याची मोठी घोषणा