Air India : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार!

'या' कारणांमुळे कंपनीचे विलीनीकरण


मुंबई : टाटा उद्योग (TATA Group) समूहाच्या अंतर्गत विमानसेवा पुरवणाऱ्या एअर इंडिया (Air India) आणि विस्तारा (Vistara) या दोन्ही कंपन्या नेहमीच चर्चेत असतात. सध्या आर्थिक नुकसान होत असल्यामुळे या दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण सुरु आहे. मात्र या विलीनीकरणाचा फटका कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे तब्बल ६०० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर सध्या टांगती तलवार (Jobless) उभारली गेली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, तोट्यात चाललेल्या या दोन्ही विमान कंपन्या टाटा समूहाच्या मालकीच्या आहेत. त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या २३००० पेक्षा जास्त आहे. विमान वाहतूक व्यवसायामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्या विमान कंपन्यांचे विलीनीकरण करण्याच्या प्रक्रियेवर काम करत आहे. ही प्रक्रिया सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला पूर्ण होऊ शकते. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाधित कर्मचाऱ्यांची नेमकी संख्या कळेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.



कर्मचाऱ्यांना मिळणार इतर गटात नोकरी


विलीनीकरण प्रक्रियेचा परिणाम ६०० कर्मचाऱ्यांवर होण्याची अपेक्षा आहे. मात्र नोकरी धोक्यात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना एअर इंडियासह टाटा समूहाच्या इतर कंपन्यांमध्ये रोजगार देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जे कर्मचारी कोणत्याही गटाशी जुळवून घेऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी स्वेच्छा सेवानिवृत्ती योजना म्हणजेच VRS सुरू केले जाईल.


दरम्यान, एअरलाइन्स कर्मचाऱ्यांची निवड ही त्यांचा पूर्वीचा अनुभव, कामगिरी आणि इतर बाबी लक्षात घेऊन केली जात आहे. या विलीनीकरण प्रक्रियेचा दोन्ही एअरलाइन्सच्या क्रू मेंबर्स आणि पायलटवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यासोबत एअर इंडिया एक्सप्रेस आणि एआयएक्स कनेक्ट यांचेही विलीनीकरण होणार आहे.

Comments
Add Comment

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे

बिलासपूरमध्ये भूस्खलनाचा भीषण अपघात; बसवर दरड कोसळल्याने १५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, बचाव कार्य सुरू

बिलासपूर: हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर