PM Narendra Modi : भारताने युद्ध नव्हे तर बुद्ध दिलेत, पाहा ऑस्ट्रियामध्ये काय म्हणाले पंतप्रधान मोदी...

नवी दिल्ली: दोन दिवसांच्या ऑस्ट्रिया दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या दिवशी व्हिएन्नामध्ये एका कार्यक्रमात सामील झाले. या दरम्यान त्यांनी भारतीय समुदायाला संबोधित केले आणि सांगितले की भारताने जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिले आहेत. व्हिएनामध्ये झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी जसे मंचावर पोहोचले तसे लोकांनी मोदी, मोदी अशा घोषणा दिल्या.


त्यांनी तेथील भारतीय गटाला संबोधित करताना म्हटले, ऑस्ट्रिया हा माझा पहिला दौरा आहे. येथील उत्साह खरच अद्भुत आहे. ४१ वर्षांनी भारताचे पंतप्रधान येथे येत आहेत. ही प्रतीक्षा एका ऐतिहासिक क्षणी संपली आहे. भारत आणि ऑस्ट्रिया आपली ७५ वर्षांची मैत्री साजरी करत आहे.



भारत-ऑस्ट्रिया दोन दिशेला मात्र अनेक गोष्टीत साम्य


पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणादरम्यान म्हटले, भौगोलिकदृष्टया भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन विविध दिशेला आहेत मात्र आमच्या दोघांमध्ये अनेक गोष्टींमध्ये समानता आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की लोकशाही या दोन्ही देशांना जोडते. स्वातंत्र्य, समानता, कायद्याचा आदर ही आमची मूल्ये आहेत.



भारताला स्थिरता हवी आहे


व्हिएनामध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, ६० वर्षानंतर एका सरकारला सलग तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी भारतात मिळाली आहे. आम्ही जगात कोविडनंतर चारही बाजूला राजकीय अस्थिरता पाहिला. अधिकतर देशांत सरकारसाठी सर्व्हाईव्ह करणे सोपे नव्हते. पुन्हा निवडून येणे हे मोठे आव्हान होते. अशा स्थिती भारताच्या जनतेने माझ्यावर तसेच माझ्या पक्षावर पुन्हा विश्वास दाखवला. एनडीएवर विश्वास दाखवला यावरून हे दिसते ती भारताला स्थिरता हवी आहे.

Comments
Add Comment

‘मी तुमच्या मुलीच्या वयाची आहे’; स्टेजवरूनच प्रांजल दहियाने गैरवर्तन करण्याऱ्या प्रेक्षकांना सुनावले खडेबोल

हरियाणा : हरियाणाची प्रसिद्ध गायिका आणि नृत्यांगना प्रांजल दहिया सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. एका लाइव्ह

टाटा–एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेसला भीषण आग, २० हून अधिक प्रवासी जखमी, १ मृत्यू

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री भीषण रेल्वे अपघात घडला.

चिनाब नदीवर जलविद्युत प्रकल्पासाठी निविदा िनघणार

पाकिस्तानचे पाणी थांबणार नवी दिल्ली : भारताने जम्मू-कश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चिनाब नदीवर २६० मेगावॅट

राहुल बाबा, इतक्यात थकू नका; अजून बरेच पराभव पाहायचे आहेत

गृहमंत्री अमित शहा यांचा टोला अहमदाबाद : "काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारंवार होणाऱ्या पराभवामुळे आताच थकून

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.

'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींनी घेतला वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच रविवार २८ डिसेंबर २०२५ रोजी १२९ व्या 'मन की बात'