PM Narendra Modi : भारताने युद्ध नव्हे तर बुद्ध दिलेत, पाहा ऑस्ट्रियामध्ये काय म्हणाले पंतप्रधान मोदी...

नवी दिल्ली: दोन दिवसांच्या ऑस्ट्रिया दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या दिवशी व्हिएन्नामध्ये एका कार्यक्रमात सामील झाले. या दरम्यान त्यांनी भारतीय समुदायाला संबोधित केले आणि सांगितले की भारताने जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिले आहेत. व्हिएनामध्ये झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी जसे मंचावर पोहोचले तसे लोकांनी मोदी, मोदी अशा घोषणा दिल्या.


त्यांनी तेथील भारतीय गटाला संबोधित करताना म्हटले, ऑस्ट्रिया हा माझा पहिला दौरा आहे. येथील उत्साह खरच अद्भुत आहे. ४१ वर्षांनी भारताचे पंतप्रधान येथे येत आहेत. ही प्रतीक्षा एका ऐतिहासिक क्षणी संपली आहे. भारत आणि ऑस्ट्रिया आपली ७५ वर्षांची मैत्री साजरी करत आहे.



भारत-ऑस्ट्रिया दोन दिशेला मात्र अनेक गोष्टीत साम्य


पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणादरम्यान म्हटले, भौगोलिकदृष्टया भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन विविध दिशेला आहेत मात्र आमच्या दोघांमध्ये अनेक गोष्टींमध्ये समानता आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की लोकशाही या दोन्ही देशांना जोडते. स्वातंत्र्य, समानता, कायद्याचा आदर ही आमची मूल्ये आहेत.



भारताला स्थिरता हवी आहे


व्हिएनामध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, ६० वर्षानंतर एका सरकारला सलग तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी भारतात मिळाली आहे. आम्ही जगात कोविडनंतर चारही बाजूला राजकीय अस्थिरता पाहिला. अधिकतर देशांत सरकारसाठी सर्व्हाईव्ह करणे सोपे नव्हते. पुन्हा निवडून येणे हे मोठे आव्हान होते. अशा स्थिती भारताच्या जनतेने माझ्यावर तसेच माझ्या पक्षावर पुन्हा विश्वास दाखवला. एनडीएवर विश्वास दाखवला यावरून हे दिसते ती भारताला स्थिरता हवी आहे.

Comments
Add Comment

Tirupati laddu : तिरुपती लाडू भेसळ प्रकरण : सीबीआयकडून मोठा खुलासा; लाडूमध्ये 'बीफ टॅलो' किंवा प्राण्यांची चरबी नसल्याचे स्पष्ट

नेल्लोर : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या तिरुपती लाडू भेसळ प्रकरणात सीबीआयने (CBI) आपला अंतिम आरोपपत्र (Chargesheet)

Union Budget 2026 : १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प! काय स्वस्त, काय महाग? बजेट मध्ये यंदा काय खास? सुट्टीच्या दिवशी इथे LIVE पहा अर्थसंकल्प

नवी दिल्ली : देशाच्या आर्थिक प्रगतीचा लेखाजोखा मांडणारा 'केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७' येत्या रविवारी, १

P. T. Usha: धावपटू पी.टी. उषा यांच्या पतीचे निधन; पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

प्रसिद्ध धावपटू पी. टी. उषा यांच्या पतीचे निधन झाले आहे. पी. टी. उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांनी वयाच्या ६७ व्या

आयुष मंत्रालयाचा झेप्टोसोबत सामंजस्य करार

आता १० मिनिटांत औषधं दारात! नवी दिल्ली : देशातील सर्वसामान्य नागरिकांना आयुष औषधं आणि वेलनेस औषधं सहज उपलब्ध

योजना केवळ कागदांवर न राहता थेट नागरिकांच्या जीवनात पोहोचाव्यात

अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी घेतला विकासाचा आढावा नवी दिल्ली : जरी सध्या देशाचे लक्ष अर्थसंकल्पाकडे

Shashi Tharoor : 'आमच्यात सर्वकाही अलबेल',राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना भेटल्यानंतर शशी थरूर यांचं विधान

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी आज, गुरुवारी (२९ जानेवारी) पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी