‘ग्रासीम इंडस्ट्रीज’ विरोधात ग्रामस्थांचे गेटसमोर आंदोलन!

स्थानिकांना रोजगार, ठेके देण्याची मागणी


महाड : महाड औद्योगिक क्षेत्रात नव्याने होऊ घातलेल्या ग्रासीम इंडस्ट्रीज या कंपनी प्रकल्पात वारंवार मागणी करूनही स्थानिकांना प्राधान्य न देता, बाहेरील भरती सुरू केल्याने देशमुख कांबळे गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून, त्यांनी मंगळवारी कंपनीच्या विरोधात गेटसमोर आंदोलन करीत, स्थानिकांना नोकरी व ठेके न दिल्यास, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.


महाड एमआयडीसीमधील नव्याने उभ्या राहत असलेल्या ग्रासीम इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीविरोधात देशमुख कांबळे परिसरातील स्थानिक ग्रामस्थ एकवटले आहेत. त्यांनी कंपनीच्या धोरणाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. कंपनीने स्थानिकांना रोजगार देण्याऐवजी ठेकेदारी पद्धतीने बाहेरील कामगारांची भरती केली आहे. कुशल कामगारांना देखील थर्ड पार्टी पद्धतीने नोकऱ्या देण्यात आल्या. या विरोधात त्यांनी कंपनीच्या गेटवर आंदोलन सुरू केले.


कंपनीने स्थानिकांना रोजगार द्यावा, कुशल कामगार स्थानिकच घ्यावेत, तसेच कंपनीला आवश्यक साहित्याचा पुरवठा करण्यासाठी स्थानिक ठेकेदारच नेमावेत, अशी त्यांची मागणी आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी अनेकदा कंपनी प्रशासनाशी संपर्क साधला, पंरतु त्याकडे कंपनीकडून दुर्लक्ष केले गेले. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला. ग्रामस्थ आक्रमक होण्याची शक्यता लक्षात घेऊन, या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. यावेळी देशमुख कांबळे ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील देशमुख, बंडू देशमुख यांसह ग्रामपंचायत सदस्य व सर्व पक्षीय पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध