‘ग्रासीम इंडस्ट्रीज’ विरोधात ग्रामस्थांचे गेटसमोर आंदोलन!

स्थानिकांना रोजगार, ठेके देण्याची मागणी


महाड : महाड औद्योगिक क्षेत्रात नव्याने होऊ घातलेल्या ग्रासीम इंडस्ट्रीज या कंपनी प्रकल्पात वारंवार मागणी करूनही स्थानिकांना प्राधान्य न देता, बाहेरील भरती सुरू केल्याने देशमुख कांबळे गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून, त्यांनी मंगळवारी कंपनीच्या विरोधात गेटसमोर आंदोलन करीत, स्थानिकांना नोकरी व ठेके न दिल्यास, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.


महाड एमआयडीसीमधील नव्याने उभ्या राहत असलेल्या ग्रासीम इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीविरोधात देशमुख कांबळे परिसरातील स्थानिक ग्रामस्थ एकवटले आहेत. त्यांनी कंपनीच्या धोरणाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. कंपनीने स्थानिकांना रोजगार देण्याऐवजी ठेकेदारी पद्धतीने बाहेरील कामगारांची भरती केली आहे. कुशल कामगारांना देखील थर्ड पार्टी पद्धतीने नोकऱ्या देण्यात आल्या. या विरोधात त्यांनी कंपनीच्या गेटवर आंदोलन सुरू केले.


कंपनीने स्थानिकांना रोजगार द्यावा, कुशल कामगार स्थानिकच घ्यावेत, तसेच कंपनीला आवश्यक साहित्याचा पुरवठा करण्यासाठी स्थानिक ठेकेदारच नेमावेत, अशी त्यांची मागणी आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी अनेकदा कंपनी प्रशासनाशी संपर्क साधला, पंरतु त्याकडे कंपनीकडून दुर्लक्ष केले गेले. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला. ग्रामस्थ आक्रमक होण्याची शक्यता लक्षात घेऊन, या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. यावेळी देशमुख कांबळे ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील देशमुख, बंडू देशमुख यांसह ग्रामपंचायत सदस्य व सर्व पक्षीय पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला