Water Crisis : शहापूर गावात ४ वर्षांपासून पाणी नसल्याने ग्रामस्थ आक्रमक!

  83

अलिबाग : तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शहापूर (Shahapur) गावात गेल्या चार वर्षांपासून पिण्याचे पाणी येत (Water Supply) नसल्याने पाणी विकतचे आणावे लागते. यापुढे प्रत्यक्ष नळाद्वारे पिण्याचे पाणी घरात येईपर्यंत रायगड (Raigad) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांना एक हजार स्मरणपत्रे पाठविण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या वतीने स्थानिक ग्रामस्थ राजन भगत यांनी घेतला आहे.


राजन भगत यांनी तसे पत्र ८ जुलै रोजी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांना पाठविले. आदर्शनगर या भागात मुख्य रस्त्यापासून १० मीटर अंतरावर आहे. त्याची नळजोडणी जलवाहिनीच्या ज्या सर्व्हिस लाईनवर होती, ती सर्व्हिस लाईन ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा विभागाने न सांगता काढून नेली. तेंव्हापासून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी येणे बंद झाले. हे ग्रामस्थ सर्वचजण वरिष्ठ नागरिक व निवृत्त शिक्षक असल्याने रोजच्या गरजेसाठी दर १५ दिवसांनी पाणी विकत घेतात.


सर्व्हिस लाईन व जलजीवन याचा काडीमात्र संबंध नसल्याचे सांगताना भारतीय राज्य घटनेतील कलम २१ अन्वये प्राप्त मुलभूत अधिकारात आम्हाला पिण्याचे पाणी मिळण्याचा अधिकार नमूद आहे. सर्वच जण आमच्या प्राप्त मूलभूत अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असून, आमच्या जगण्याच्या अधिकारावर गदा आणत आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई यांच्याकडे नव्याने तक्रार दाखल केल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची