Water Crisis : शहापूर गावात ४ वर्षांपासून पाणी नसल्याने ग्रामस्थ आक्रमक!

  76

अलिबाग : तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शहापूर (Shahapur) गावात गेल्या चार वर्षांपासून पिण्याचे पाणी येत (Water Supply) नसल्याने पाणी विकतचे आणावे लागते. यापुढे प्रत्यक्ष नळाद्वारे पिण्याचे पाणी घरात येईपर्यंत रायगड (Raigad) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांना एक हजार स्मरणपत्रे पाठविण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या वतीने स्थानिक ग्रामस्थ राजन भगत यांनी घेतला आहे.


राजन भगत यांनी तसे पत्र ८ जुलै रोजी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांना पाठविले. आदर्शनगर या भागात मुख्य रस्त्यापासून १० मीटर अंतरावर आहे. त्याची नळजोडणी जलवाहिनीच्या ज्या सर्व्हिस लाईनवर होती, ती सर्व्हिस लाईन ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा विभागाने न सांगता काढून नेली. तेंव्हापासून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी येणे बंद झाले. हे ग्रामस्थ सर्वचजण वरिष्ठ नागरिक व निवृत्त शिक्षक असल्याने रोजच्या गरजेसाठी दर १५ दिवसांनी पाणी विकत घेतात.


सर्व्हिस लाईन व जलजीवन याचा काडीमात्र संबंध नसल्याचे सांगताना भारतीय राज्य घटनेतील कलम २१ अन्वये प्राप्त मुलभूत अधिकारात आम्हाला पिण्याचे पाणी मिळण्याचा अधिकार नमूद आहे. सर्वच जण आमच्या प्राप्त मूलभूत अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असून, आमच्या जगण्याच्या अधिकारावर गदा आणत आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई यांच्याकडे नव्याने तक्रार दाखल केल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

Comments
Add Comment

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Madhuri Misal : नागरिकांना मिळणार दिलासा ! मिळकतकरासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने राज्यसरकारकडे पाठवावा...

पुणे :  मिळकत करावर दंड आणि व्याज लावला जात असल्याने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नागरिकांसाठी मोठा निर्णय

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर प्रवाशांना भरवा लागणार युजर शुल्क

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळ कधी सुरु होणार या प्रतिक्षेत गेल्या अनेक महिन्यांपासून नवी मुंबईकर आहेत. परंतू

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

Devendra Fadanvis 'आम्ही सर्व जनतेचे सेवक', लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका...

मुंबई : भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या विधानावरुन अडचणीत वाढ

पंचवटीसह द्वारका परिसरात सलग पाचव्या दिवशी पाणीटंचाई

नागरिक त्रस्त : निलगिरी बाग केंद्रावर तांत्रिक बिघाड जैसे थे नाशिक : निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्राला