Water Crisis : शहापूर गावात ४ वर्षांपासून पाणी नसल्याने ग्रामस्थ आक्रमक!

  86

अलिबाग : तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शहापूर (Shahapur) गावात गेल्या चार वर्षांपासून पिण्याचे पाणी येत (Water Supply) नसल्याने पाणी विकतचे आणावे लागते. यापुढे प्रत्यक्ष नळाद्वारे पिण्याचे पाणी घरात येईपर्यंत रायगड (Raigad) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांना एक हजार स्मरणपत्रे पाठविण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या वतीने स्थानिक ग्रामस्थ राजन भगत यांनी घेतला आहे.


राजन भगत यांनी तसे पत्र ८ जुलै रोजी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांना पाठविले. आदर्शनगर या भागात मुख्य रस्त्यापासून १० मीटर अंतरावर आहे. त्याची नळजोडणी जलवाहिनीच्या ज्या सर्व्हिस लाईनवर होती, ती सर्व्हिस लाईन ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा विभागाने न सांगता काढून नेली. तेंव्हापासून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी येणे बंद झाले. हे ग्रामस्थ सर्वचजण वरिष्ठ नागरिक व निवृत्त शिक्षक असल्याने रोजच्या गरजेसाठी दर १५ दिवसांनी पाणी विकत घेतात.


सर्व्हिस लाईन व जलजीवन याचा काडीमात्र संबंध नसल्याचे सांगताना भारतीय राज्य घटनेतील कलम २१ अन्वये प्राप्त मुलभूत अधिकारात आम्हाला पिण्याचे पाणी मिळण्याचा अधिकार नमूद आहे. सर्वच जण आमच्या प्राप्त मूलभूत अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असून, आमच्या जगण्याच्या अधिकारावर गदा आणत आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई यांच्याकडे नव्याने तक्रार दाखल केल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

Comments
Add Comment

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती पेठांमध्ये वाहतुकीची कोंडी

वाहतुकीचा वेग संथ झाल्याने अडचणी पुणे : गणेशोत्सवाला अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असताना मंडई, शनिपार, तुळशीबाग

गणेशोत्सवासाठी प्लास्टिक फुलांची दुकाने सजली...!

फुलशेती कोमेजली, शासनाने प्लास्टिक फूल, हार विक्रीवर बंदी घालावी श्रीरामपूर : एकीकडे प्लास्टिक बंदीचा जागर सुरू

ST Employees Salary: बाप्पा पावले! एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्टचा पगार गणेशोत्सवापूर्वीच मिळणार

मुंबई: राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्याप्रमाणे एसटीच्या सुमारे ८३ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचा

अंतरवाली सराटीमधून 27 ऑगस्टला मुंबईसाठी निघणार, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टला सकाळी १० वाजल्यापासून मुंबईच्या आझाद मैदानावर

Atharv Sudame controversy: गणेशोत्सवापूर्वी व्हायरल झालेल्या 'त्या' रीलमुळे पुण्याचा कंटेंट क्रिएटर अथर्व सुदामे अडचणीत! मागितली माफी

पुणे: लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर अथर्व सुदामेच्या पुणेरी रील्सचे अनेक चाहते आहेत. सुदामेने त्याच्या

Mumbai Nanded Vande Bharat : मुंबई-जालना वंदे भारत आता नांदेडपर्यंत धावणार, जाणून घ्या वेळापत्रक, थांबे अन् तिकीटदर

मुंबई : मुंबई आणि मराठवाड्यातील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू