अलिबाग : मुंबई-गोवा मार्गावरुन (Mumbai Goa Highway) प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पुढील तीन दिवस काही काळासाठी मुंबई-गोवा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. आगामी काळात येणाऱ्या गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागू नये यासाठी प्रशासनाने ऐन पावसाळ्यात येथील पुलाचे काम हाती घेतले आहे. कामानिमित्त ठराविक वेळेत महामार्ग बंद ठेवला जाणार असल्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
वाहतुक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी मुंबई-गोवा महार्गावरील वाहतूकीबाबत सुचना जारी केली आहे. त्यानुसार, कित्येक वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम प्रशासनाने तातडीने हाती घेतले आहे. कोलाड जवळील म्हैसदरा नदीवर नवा पुल बांधण्यात येत आहे. त्यासाठी ५ गर्डर टाकण्यात येणार आहेत. गुरुवार ११ जुलै ते १३ जुलै असे सलग तीन दिवस हे गर्डर टाकण्याचे काम सुरु राहणार आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सकाळी ६ ते ८ आणि दुपारी २ ते ४ या काळात बंद राहणार असून प्रवाशांना या काळात पर्यायी मार्गांचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…