Mumbai Goa Highway : प्रवाशांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर तीन दिवस वाहतूक बंद

'हे' असतील पर्यायी मार्ग


अलिबाग : मुंबई-गोवा मार्गावरुन (Mumbai Goa Highway) प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पुढील तीन दिवस काही काळासाठी मुंबई-गोवा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. आगामी काळात येणाऱ्या गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागू नये यासाठी प्रशासनाने ऐन पावसाळ्यात येथील पुलाचे काम हाती घेतले आहे. कामानिमित्त ठराविक वेळेत महामार्ग बंद ठेवला जाणार असल्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.


वाहतुक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी मुंबई-गोवा महार्गावरील वाहतूकीबाबत सुचना जारी केली आहे. त्यानुसार, कित्येक वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम प्रशासनाने तातडीने हाती घेतले आहे. कोलाड जवळील म्हैसदरा नदीवर नवा पुल बांधण्यात येत आहे. त्यासाठी ५ गर्डर टाकण्यात येणार आहेत. गुरुवार ११ जुलै ते १३ जुलै असे सलग तीन दिवस हे गर्डर टाकण्याचे काम सुरु राहणार आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सकाळी ६ ते ८ आणि दुपारी २ ते ४ या काळात बंद राहणार असून प्रवाशांना या काळात पर्यायी मार्गांचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे.



पर्यायी मार्ग कोणते?



  • वाहनचालकांना वाकण - पाली - भिसेखिंड - रोहा, कोलाड मार्गे मुंबई गोवा महामार्गावर जाता येईल.

  • वाकण येथून महामार्गावरील वाहतूक पाली, रवाळजे, निजामपूर, माणगाव येथून मुंबई गोवा महामार्गाला पुढे जाता येईल.

  • खोपोली - पाली - रवाळजे - निजामपूर - माणगाव मार्गे मुंबई गोवा महामार्ग असा पर्यायी मार्ग उपलब्ध आहे.

Comments
Add Comment

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

धक्कादायक! एसटीचे ७ कर्मचारी दारू पिऊन ड्युटीवर!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कारवाईचा बडगा मुंबई : अचानक केलेल्या तपासणीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना