वसई-विरार महापालिका परिसरातील रस्त्यांची दुर्दशा!

नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांचा मनस्ताप


पालघर : मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) वसई (Vasai), विरार (Virar) शहरातील महानगरपालिकेच्या रस्त्यांची गेल्या आठवड्यात दुर्दशा झाली आहे. शहरातील रस्त्यांची दुर्दशा (Bad Road condition) झाल्याने प्रवासी वाहने व नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.


गेल्या आठवड्यात झालेल्या शहराच्या पूर्वेस असलेल्या अनेक रस्त्याची पार चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना आपली वाहने जीव मुठीत धरून चालवाव्या लागत आहेत. तर पादचाऱ्यांना रस्त्यावरून येजा करणे,अशक्य झाले आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना आणि प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.


अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट, पाणीचोरी, घरपट्टी घोटाळा, वसुली, नैसर्गिक नाल्यातील अनधिकृत बांधकामे,अतिवृष्टी झाली की शहरात पाणी तुंबून किमान तीन दिवस जनजीवन विस्कळीत होणे, साफसफाई न करणे व चार शहरातील रस्त्याची दुर्दशा, असा अनागोंदी कारभार करदात्यांच्या पाचवीला पुजला आहे. यंदा पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी महानगरपालिकेने ठेकेदारांना पॅचवर्क करण्याचे ठेके दिले होते. पण ठेकेदारांनी थुकपट्टीची कामे करत महानगरपालिकेला चांगलाच चुना लावला आहे.


या सर्व ठेकेदारांना मनपा अधिकारी व राजकीय पाठबळ असल्यामुळे नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवण्यात येत असते. यंदा मनपा हद्दीत असलेल्या नैसर्गिक नाल्याची पावसाळ्यापूर्वी साफसफाई न झाल्यामुळे हद्दीतील चार शहरे पाण्याखाली जाण्याची भिती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मनपा दरवर्षी रस्ते दुरुस्ती व नालेसफाईवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत असते, पण त्याचा फायदा करदात्यांना होत नाही. उलटपक्षी मनपा अधिकारी व ठेकेदार मात्र मालामाल झाले आहेत.

Comments
Add Comment

Raigad Crime : सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेचे अपहरण करून खून; दोघांना अटक

रायगड : सोन्याच्या दागिन्यांच्या लालसेपोटी एका महिलेचे अपहरण करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना मांडवा

Actress Sambhavna : शेवटी देवाने एका आईची हाक ऐकलीच; चक्क ४५ वर्षांच्या अभिनेत्रीने दिला जुळ्या मुलांना जन्म

मुंबई : लग्नानंतर प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं की तिने आई व्हाव . काहीचं हे स्वप्न पूर्ण होतं तर काहींचं होत नाही

Ritesh Deshmukh : "महाराजांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता"; व्हायरल व्हिडीओनंतर रितेश देशमुखचे स्पष्टीकरण, ट्रोलर्सना दिले चोख उत्तर

मुंबई : अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) दिग्दर्शित 'राजा शिवाजी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार यश

Jalgaon News : १२ वर्षीय गणेशच्या मृत्यूला नवं वळण; दोन महिन्यांनंतर मृतदेह बाहेर काढला

जळगाव : जळगावच्या धरणगाव (Dharangaon ) तालुक्यातील रेल येथे क्रिकेट खेळत असताना १२ वर्षीय गणेश नवल पाटील या मुलाचा मृत्यू

Kandivali Crime: कांदिवली मेट्रो लिफ्टमधील विनयभंग प्रकरण; फरार आरोपीला ट्रेनमधून अटक

मुंबईतील कांदिवली भागात असलेल्या धहानुकरवाडी मेट्रो स्टेशनच्या लिफ्टमध्ये एका १७ वर्षीय मुलीचा विनयभंग

Jodhpur female influencer: ट्रोलिंगचा त्रास असह्य झाला; जोधपूरमधील महिला इन्फ्लुएन्सरने उचलले टोकाचे पाऊल

जोधपूर : जोधपूरमध्ये सोशल मीडियावरील ट्रोलिंगला कंटाळून एका महिला कंटेंट क्रिएटरने (Content Creator) आत्महत्येचा प्रयत्न