Central Railway : पावसाची विश्रांती पण मध्य रेल्वेची सेवा अजूनही विस्कळीत!

पंधरा ते वीस मिनिटे लोकल उशिरा


मुंबई : मान्सून (Monsoon) सुरु होऊनही मनासारखा न झालेला पाऊस परवा रात्री मात्र मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत धो धो कोसळला. मुसळधार पावसाने (Heavy rainfall) मुंबईला झोडपून काढलं आणि अवघ्या काही तासांतच मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं. काल मध्य (Central Railway) आणि हार्बर रेल्वे (Harbour railway) मार्गावर तर रेल्वेसेवा ठप्प झाली. यानंतर रात्री पुन्हा एकदा मुसळधार पाऊस झाला. मात्र, आज पहाटेपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. असं असलं तरी मध्य रेल्वेचं रडगाणं सुरुच आहे. मध्य रेल्वे पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होत आहे.


मुंबई आणि उपनगरात झालेल्या मुसळधार पावसामुळे काल विस्कळीत असलेली मध्य रेल्वेची वाहतूक आज सुरू तर झाली मात्र ती उशिराने धावत आहे. आज सकाळच्या सुमारास कल्याण, बदलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. नऊ वाजताच्या सुमारास रेल्वे थोडीफार पूर्व पदावर आली असली तरी पाच ते दहा मिनिटांनी उशिराने धावत होती.


लांब पल्ल्याच्या गाड्या तर तासभर उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. कल्याण रेल्वे स्थानकात लांबच्या प्रवासासाठी निघालेले प्रवासी ताटकळत आहेत. तर पश्चिम रेल्वे सुरळीत सुरु आहे.



मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी


हवामान खात्याने मुंबई महानगराला पावसाचा रेड अलर्ट जारी केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज (मंगळवार दिनांक 9 जुलै २०२४) रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने याबाबत घोषणा केली. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा मदत सेवा क्रमांक १९१६ यावर संपर्क साधा, अशी सूचनाही प्रशासनाने नागरिकांना केली आहे.

Comments
Add Comment

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील