Central Railway : पावसाची विश्रांती पण मध्य रेल्वेची सेवा अजूनही विस्कळीत!

पंधरा ते वीस मिनिटे लोकल उशिरा


मुंबई : मान्सून (Monsoon) सुरु होऊनही मनासारखा न झालेला पाऊस परवा रात्री मात्र मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत धो धो कोसळला. मुसळधार पावसाने (Heavy rainfall) मुंबईला झोडपून काढलं आणि अवघ्या काही तासांतच मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं. काल मध्य (Central Railway) आणि हार्बर रेल्वे (Harbour railway) मार्गावर तर रेल्वेसेवा ठप्प झाली. यानंतर रात्री पुन्हा एकदा मुसळधार पाऊस झाला. मात्र, आज पहाटेपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. असं असलं तरी मध्य रेल्वेचं रडगाणं सुरुच आहे. मध्य रेल्वे पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होत आहे.


मुंबई आणि उपनगरात झालेल्या मुसळधार पावसामुळे काल विस्कळीत असलेली मध्य रेल्वेची वाहतूक आज सुरू तर झाली मात्र ती उशिराने धावत आहे. आज सकाळच्या सुमारास कल्याण, बदलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. नऊ वाजताच्या सुमारास रेल्वे थोडीफार पूर्व पदावर आली असली तरी पाच ते दहा मिनिटांनी उशिराने धावत होती.


लांब पल्ल्याच्या गाड्या तर तासभर उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. कल्याण रेल्वे स्थानकात लांबच्या प्रवासासाठी निघालेले प्रवासी ताटकळत आहेत. तर पश्चिम रेल्वे सुरळीत सुरु आहे.



मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी


हवामान खात्याने मुंबई महानगराला पावसाचा रेड अलर्ट जारी केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज (मंगळवार दिनांक 9 जुलै २०२४) रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने याबाबत घोषणा केली. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा मदत सेवा क्रमांक १९१६ यावर संपर्क साधा, अशी सूचनाही प्रशासनाने नागरिकांना केली आहे.

Comments
Add Comment

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; मंगळवारी 'या' भागात होणार पाणी कपात

मुंबई: मुंबईकरांसाठी फार महत्वाची बातमी समोर आली आहे. मंगळवार १० फेब्रुवारी रोजी मुंबईमधल्या अनेक ठिकाणी पाणी

रितू तावडे मुंबईच्या आठव्या महिला महापौर

मुंबई: मुंबई महापालिकेच्या इतिहासात १९५५ पासून ते २०१७ या कालावधीत ७ महिला नगरसेविका महापौर झाल्या आहेत. १९५५ -५६

अजित पवारांचे विमान लँड करण्याचा निर्णय वैमानिकाचा, की कोणी ‘कमांड’ दिली?

 तपासात नवा ट्वीस्ट; दृष्यमानता कमी असतानाही परवानगी कशी मिळाली, या दिशेने तपास सुरू मुंबई : राज्याचे दिवंगत

Mumbai Local : पहिला बुरखा परिधान करून महिलांच्या डब्यात प्रवेश, नंतर अनेकींना घाणेरडा स्पर्श अन् संशय येताच चालत्या ट्रेनमधून पसार!

मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. एका धावत्या

काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा मुंबई : “काँग्रेसच्या

Pune: दहावी-बारावी परीक्षेआधी पुणे प्रशासन ॲक्शन मोडवर; नियमांचे पालन न केल्यास होणार कडक कारवाई

पुणे: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र परीक्षांचे वारे वाहू लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा १०