ST Bus : मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा ठप्प! जाणून घ्या एसटी बस कुठून व कधी सुटणार?

हार्बर रेल्वे तसेच मेल एक्स्प्रेस रद्द झाल्याने अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा


मुंबई : मुंबईत काल रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे (Mumbai heavy rainfall) मुंबईचे चांगलेच हाल झाले आहेत. अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचलं आहे तर रेल्वेसेवाही (Mumbai Railway) ठप्प झाली आहे. काही रेल्वे जागच्या जागी थांबल्या, त्यामुळे प्रवासी थेट पटरीवर उतरले आणि चालत निघाले. हार्बर रेल्वेसेवा (Harbour railway) देखील बंद झाली आहे. यामुळे या मार्गावर अडकलेल्या प्रवाशांसाठी एसटी बसची (ST Bus) सुविधा उपलब्ध असणार आहे. नेमक्या या बसेस कुठून व कधी सुटणार हे जाणून घ्या.


आज ८ जुलै रोजी हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद असल्याने तेथे अडकलेल्या प्रवाशांसाठी या बसेस असणार आहेत-
१) पनवेल ते दादर मार्गावर ९.००, ९.०५, १०.१५, १०.३०, १०.४०
२) पनवेल ते वाशी १०.२०
३) उरण ते दादर ५.३०, ६.३०, ७.००, ७.३०, ८.१५, ८.४५, ९.१०, ९.३०, १०.३०

त्याचप्रमाणे मेल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्याने येथील प्रवाशांच्या सोयीसाठी भिवंडी, ठाणे, त्र्यंबकेश्वर, सातारा, कराड या बसेस तसेच श्रीवर्धन रायगड, चिपळूण, शिवथर रत्नागिरी बसेस छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानका (सीएसएमटी) वरुन सोडण्यात येत आहेत. एसटी महामंडळाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.


Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून