जगबुडीने ओलांडली धोक्याची पातळी, खेड, चिपळूण, महाड, दापोली या चार तालुक्यात पुरस्थिती गंभीर
मुंबई : राज्याच्या अनेक भागात पावसाची जोरदार बॅटींग सुरू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर अनेक नदी नाल्यांना पूर आले आहे. मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात देखील जोरदार पाऊस कोसळत असून संपूर्ण कोकणसह राज्यातील काही जिल्ह्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये नद्यांना पूर आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, येत्या २४ तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणात आज रेड अलर्ट जारी केला असून या भागात अतिवृष्टी तसेच मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. मुसळधार पाऊस, नदी-नाले तुडूंब वाहत आहेत. पुन्हा एकदा खेड, चिपळूण, महाड ही तीन शहरे पुराच्या उंबरठ्यावर आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तर हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे.
कोकणातील अनेक रस्ते हे पाण्याखाली गेले आहेत. खेड शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खेड-दापोली मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. या सगळ्यावर प्रशासन लक्ष देऊन असून आवश्यक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे.
रत्नागिरी-संगमेश्वर-खेड-चिपळूण आणि दापोली तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. ग्रामीण भागातील एसटी वाहतूकही कोलमडली आहे. यामुळे कामानिमित्त ये-जा करणारे नागरिक तसेच शासकीय कर्मचाऱ्यांची देखील मोठी अडचण झाली आहे.
तसेच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. तर सांगलीतही कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…