Shahapur Rain : शहापूरात रात्रभर पावसाची जोर 'धार'!

भारंगी नदीला पूर, गाड्या वाहून गेल्या, वाहतूकही ठप्प


खर्डी : जुलै महिन्याला सुरुवात होताच पावसाने महाराष्ट्रभर (Maharashtra Rain) चांगलीच हजेरी लावली आहे. अशातच शहापूर तालुक्यातही पावसाने जोरदार पावसाची हजेरी लावल्याचे चित्र दिसून येत आहे. रात्रभर पडत असलेल्या मुसळधार (Heavy Rain) पावसामुळे शहापूरची तुंबई झाली आहे. शहापूरमध्ये अनेक ठिकाणी पाणी तुडुंब भरले आहे. नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक गाड्याही वाहून गेल्या आहेत. इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी भरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचे दिसून येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहापूर तालुक्यातील भारंगी नदीला (Bharangi River) पूर आला. त्यामुळे जवळच असलेल्या इमारती खाली पार्किंग केलेल्या गाड्या वाहून गेल्या. त्यासोबत खर्डी येथील बागेचा पाडाजवळ मे/जून महिन्यात बांधण्यात आलेला पूल वाहून गेल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली.



स्थानिकांकडून प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित


शहापूर-किन्हवली रस्त्यावर पाण्याचे ओहोळ निर्माण झाल्याने वाहतूक ठप्प झाली. मागील महिन्यात बांधण्यात आलेला पूर वाहून गेल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. तसेच आटगाव- आसनगाव स्थानकादरम्यान झाड आडवे पडल्याने रेल्वे वाहतूकही ठप्प झाली आहे. तसेच वासिंद रेल्वे स्थानकाजवळ पोल सरकल्याने रेल्वे वाहतूक १ तासापासून ठप्प झाल्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहापूर जलमय झाल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.


त्याचबरोबर, भारंगी नदीपात्रात केलेल्या अनधिकृत बांधकामामुळे शहापुरात सर्वत्र पाणीच पाणी साचून रहिवाशांचे नुकसान झाले आहे. याला जबाबदार असणाऱ्या ठेकेदार व दुर्लक्ष करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करून नुकसान झालेल्या कुटुंबांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी समाजसेवक संतोष शिंदे, भानुदास भोईर व अविनाश थोरात यांनी केली आहे.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य