Shahapur Rain : शहापूरात रात्रभर पावसाची जोर 'धार'!

भारंगी नदीला पूर, गाड्या वाहून गेल्या, वाहतूकही ठप्प


खर्डी : जुलै महिन्याला सुरुवात होताच पावसाने महाराष्ट्रभर (Maharashtra Rain) चांगलीच हजेरी लावली आहे. अशातच शहापूर तालुक्यातही पावसाने जोरदार पावसाची हजेरी लावल्याचे चित्र दिसून येत आहे. रात्रभर पडत असलेल्या मुसळधार (Heavy Rain) पावसामुळे शहापूरची तुंबई झाली आहे. शहापूरमध्ये अनेक ठिकाणी पाणी तुडुंब भरले आहे. नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक गाड्याही वाहून गेल्या आहेत. इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी भरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचे दिसून येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहापूर तालुक्यातील भारंगी नदीला (Bharangi River) पूर आला. त्यामुळे जवळच असलेल्या इमारती खाली पार्किंग केलेल्या गाड्या वाहून गेल्या. त्यासोबत खर्डी येथील बागेचा पाडाजवळ मे/जून महिन्यात बांधण्यात आलेला पूल वाहून गेल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली.



स्थानिकांकडून प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित


शहापूर-किन्हवली रस्त्यावर पाण्याचे ओहोळ निर्माण झाल्याने वाहतूक ठप्प झाली. मागील महिन्यात बांधण्यात आलेला पूर वाहून गेल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. तसेच आटगाव- आसनगाव स्थानकादरम्यान झाड आडवे पडल्याने रेल्वे वाहतूकही ठप्प झाली आहे. तसेच वासिंद रेल्वे स्थानकाजवळ पोल सरकल्याने रेल्वे वाहतूक १ तासापासून ठप्प झाल्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहापूर जलमय झाल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.


त्याचबरोबर, भारंगी नदीपात्रात केलेल्या अनधिकृत बांधकामामुळे शहापुरात सर्वत्र पाणीच पाणी साचून रहिवाशांचे नुकसान झाले आहे. याला जबाबदार असणाऱ्या ठेकेदार व दुर्लक्ष करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करून नुकसान झालेल्या कुटुंबांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी समाजसेवक संतोष शिंदे, भानुदास भोईर व अविनाश थोरात यांनी केली आहे.

Comments
Add Comment

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि

Amravati : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूची NHRCकडून स्वतःहून दखल; महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस

अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या देखभाल विभागात (SNCU) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा