Shinde Vs Thackeray : ऐरोलीत ठाकरेंना मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा शिनसेनेत प्रवेश

  136

विधानसभेच्या तोंडावरही ठाकरे गटाची गळती संपेना


नवी मुंबई : शिवसेना पक्षात (Shivsena) फूट पडून आता दोन वर्षे पूर्ण झाली. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील सरकार उत्तमोत्तम विकासकामे करत आहे. म्हणूनच अजूनही ठाकरे गटातील (Thackeray group) नेत्यांचा ओढा शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे. फूट पडल्यापासून ठाकरे गटाला जी गळती लागली आहे ती अद्याप थांबायचे नाव घेत नाही. अनेक बडे बडे नेते, कट्टर समर्थक यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी देखील ठाकरेंची साथ सोडून शिंदेंना साथ दिली. लोकसभेत ठाकरे गटाला जास्त जागा मिळाल्या, मात्र अजूनही शिंदेंकडे येणारा ओघ कमी झालेला नाही. त्यातच विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) तोंडावर ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ऐरोलीतील ठाकरेंचे कट्टर समर्थक असणारे माजी नगरसेवक मनोज हळदणकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.


विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच नव्याने येणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे शिंदेंची शिवसेना आणखी बळकट होत चालली आहे. नवी मुंबईतील (Navi Mumbai) ऐरोलीतील माजी नगरसेवक मनोज हळदणकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.


मनोज हळदणकर यांची ऐरोतील चांगली ताकद आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. मात्र, अचानक हळणकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.


दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगले काम करीत असून मी त्यांच्या कामापासून प्रेरित झालो आहे. आगामी काळात ऐरोलीत चांगल्या विकासकामांची गरज आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला, अशी प्रतिक्रिया मनोज हळदणकर यांनी दिली आहे.


Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या