मुंबई : दहावी आणि बारावीच्या (SSC-HSC Exam) परीक्षेत अनुत्तीर्ण (Fail) झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा (Supplementary Exam) घेण्यात येते. यंदा दहावी बारावी परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात लवकरात लवकर प्रवेश मिळावा यासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये परीक्षा न घेता जुलै-ऑगस्टमध्ये परीक्षा घेण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. यासंदर्भात तारीख देखील जाहीर केल्या आहेत.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थींची पुरवणी परीक्षा जाहीर झाली आहे. १६ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान परीक्षा होणार आहे. दहावीची पुरवणी परीक्षा १० जुलै ते ३० ऑगस्ट दरम्यान होणार आहे. तर बारावीची १६ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे.
दरम्यान, दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी कोणतेही शुल्क न घेता प्रवेशपत्राची मुद्रित प्रत विद्यार्थ्यांना देण्याची सूचना राज्य मंडळाचे प्रभारी सचिव शैलेंद्र पाटील यांनी केली आहे.
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…