New Rules : सामान्यांच्या खिशावर परिणाम होणार; जुलैपासून नियमावली बदलणार!

मुंबई : प्रत्येक महिन्याच्या १ तारखेपासून अनके गोष्टींच्या नियमांमध्ये (New Rules) बदल होतात. उद्यापासून म्हणजेच १ जुलै २०२४ पासूनही अनेक नियम बदलणार आहेत. ज्यामुळे सामान्यांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. सध्या देशातील टेलिकॉम क्षेत्रातील जिओ, एअरटेल, आयडिया व वोडाफोन या कंपन्यांनी रिचार्ज किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच आणखी काही गोष्टींच्या सेवेबाबत नियम बदल होणार आहेत. त्यामुळे सामान्यांच्या खिशावर याचा बोजा वाढणार की भार हलका होणार त्याबाबत जाणून घ्या.



सिमकार्ड पोर्ट कालावधी


सिमकार्ड पोर्ट करण्याचा कालावधी कमी करण्यात आला आहे. या आधी ग्राहकांना सिमकार्ड पोर्ट करण्यासाठी तब्बल १० दिवसांचा कालावधी लागत होता. मात्र आता सिमकार्ड पोर्ट करून हवे असेल तर फक्त सात दिवसांचा कालावधी लागणार आहे.


काहीवेळा फोन चोरी होतो तेव्हा आपण ते सिम बंद करून दुसरे सिम खरेदी करतो. तर नव्या नियमानुसार तुम्हाला आता नवीन सिम खरेदीसाठी ७ दिवस वाट पहावी लागणार आहे. वाढत असलेल्या चोरींच्या घटनांमुळे TRAI ने हा निर्णय घेतला आहे.



क्रेडिट कार्ड


क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तुम्ही देखील क्रेडिट कार्ड वापरत असाल तर येथून पुढे भारत बिल पेमेंट सिस्टमद्वारे क्रेडिट कार्ड पेमेंटची प्रक्रिया करावी लागेल. सर्व बँकांना याबाबत आदेश देण्यात आले आहेत.



गॅस सिलिंडर


प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोलियम कंपन्या LPG सिलेंडर आणि एटीएफच्या किमतीत बदल करतात. त्यात बजेटमध्ये वर्षाला तीन सिलिंडर फ्री देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे १ जुलैपासून तुम्हाला गॅस सिलिंडरवरही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

‘आशियामध्ये शांततेसाठी अरब राष्ट्राची भूमिका कौतुकास्पद’

नवी दिल्ली : अरब देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी

भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे संरक्षण बजेट

नवी दिल्ली : यंदाच्या बजेटमध्ये संरक्षण विभागासाठी ७.८ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षणासाठी

भूतान, नेपाळ, श्रीलंका याविश्वासू मित्रांसाठी मदतीचा हात, संबंधातील कडवटपणामुळे बांगलादेशला आर्थिक झटका

नवी दिल्ली  : केंद्रातील मोदी सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना आपल्या परराष्ट्र धोरणाचे

इतर देशांच्या तुलनेत किती मोठे आहे देशाचे संरक्षण बजेट

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत बजेट सादर केले. यंदाच्या बजेटमध्ये भारताच्या

Budget 2026 : ‘विकसित भारताच्या दिशेने दमदार पाऊल’; केंद्रीय अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मुंबई : देशाचा २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2026 ) सादर झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र

Budget 2026 : मच्छिमारांसाठी आनंदाची बातमी! खुल्या समुद्रातील मासेमारी आता 'करमुक्त'; निर्यातीला मिळणार मोठी गती

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात देशातील ग्रामीण