New Rules : सामान्यांच्या खिशावर परिणाम होणार; जुलैपासून नियमावली बदलणार!

मुंबई : प्रत्येक महिन्याच्या १ तारखेपासून अनके गोष्टींच्या नियमांमध्ये (New Rules) बदल होतात. उद्यापासून म्हणजेच १ जुलै २०२४ पासूनही अनेक नियम बदलणार आहेत. ज्यामुळे सामान्यांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. सध्या देशातील टेलिकॉम क्षेत्रातील जिओ, एअरटेल, आयडिया व वोडाफोन या कंपन्यांनी रिचार्ज किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच आणखी काही गोष्टींच्या सेवेबाबत नियम बदल होणार आहेत. त्यामुळे सामान्यांच्या खिशावर याचा बोजा वाढणार की भार हलका होणार त्याबाबत जाणून घ्या.



सिमकार्ड पोर्ट कालावधी


सिमकार्ड पोर्ट करण्याचा कालावधी कमी करण्यात आला आहे. या आधी ग्राहकांना सिमकार्ड पोर्ट करण्यासाठी तब्बल १० दिवसांचा कालावधी लागत होता. मात्र आता सिमकार्ड पोर्ट करून हवे असेल तर फक्त सात दिवसांचा कालावधी लागणार आहे.


काहीवेळा फोन चोरी होतो तेव्हा आपण ते सिम बंद करून दुसरे सिम खरेदी करतो. तर नव्या नियमानुसार तुम्हाला आता नवीन सिम खरेदीसाठी ७ दिवस वाट पहावी लागणार आहे. वाढत असलेल्या चोरींच्या घटनांमुळे TRAI ने हा निर्णय घेतला आहे.



क्रेडिट कार्ड


क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तुम्ही देखील क्रेडिट कार्ड वापरत असाल तर येथून पुढे भारत बिल पेमेंट सिस्टमद्वारे क्रेडिट कार्ड पेमेंटची प्रक्रिया करावी लागेल. सर्व बँकांना याबाबत आदेश देण्यात आले आहेत.



गॅस सिलिंडर


प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोलियम कंपन्या LPG सिलेंडर आणि एटीएफच्या किमतीत बदल करतात. त्यात बजेटमध्ये वर्षाला तीन सिलिंडर फ्री देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे १ जुलैपासून तुम्हाला गॅस सिलिंडरवरही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी