Naresh Mhaske : मविआने अबू आझमी यांचा चेहरा मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर करावा!

संजय राऊतांच्या मागणीवर नरेश म्हस्के यांचा खोचक टोला


नवी दिल्ली : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधानसभेत बिनाचेहऱ्याचं सरकार जास्त चालणार नाही, त्यासाठी चेहरा द्यावाच लागेल, असं म्हणत महाविकास आघाडीसाठी (Mahavikas Aghadi) उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, अशी अप्रत्यक्ष मागणी केली. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तसेच सत्ताधारी पक्षांतील नेत्यांनीही राऊतांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. ठाण्याचे खासदार व शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी यावर प्रतिक्रिया देत संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे. महाविकास आघाडीने राज्यात अबू आझमी (Abu Azmi) यांचा चेहरा मुख्यमंत्रि‍पदासाठी जाहीर करावा, असे त्यांनी म्हटले आहे.


नरेश म्हस्के म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीने अबू आझमी यांचा चेहरा मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर करावा. तसाही त्यांनी निवडणुकीत झेंड्याचा रंग बदललेला आहे. हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आहेत. उद्धव ठाकरे यांचा अडीच वर्षाचा घरात बसून केलेला कारभार आणि अडीच वर्ष पायाला भिंगरी बांधून एकनाथ शिंदे यांनी केलेला कारभार याच मूल्यमापन करावं लागेल, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.


महायुतीतील मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत नरेश म्हस्के म्हणाले की, आमच्या नेत्यांनी अनेक वेळा स्पष्ट केले आहे की, आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा एकनाथ शिंदे असतील, असे त्यांनी स्पष्ट केले.


Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी