Pune Porsche Accident : पोर्शे कार अपघातातील धनिकपुत्राला हायकोर्टाचा मोठा दिलासा

  110

बालसुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे दिले आदेश


पुणे : पुण्याच्या कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत कार चालवत दोन तरुणांना चिरडल्याच्या घटनेने (Pune Porsche Accident) अख्खा महाराष्ट्र तापला होता. हा मुलगा पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा असल्याने त्याला वाचवण्यासाठी अख्खी यंत्रणाच कशी कामाला लागली आहे, याची वारंवार उदाहरणे समोर येत होती. त्यातच आता या धनिकपुत्राला मुंबई हायकोर्टाकडून (Mumbai High court) मोठा दिलासा मिळाला आहे. त्याला बालसुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. यामागील कारणही समोर आलं आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, जामीनानंतर पुणे पोलिसांनी मुलाला पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असल्याचं मुंबई उच्च न्यायलयाने म्हटलं. मुलाची आत्या पूजा जैन हिने काही दिवसांपूर्वी हेबियस कॉर्पसअंतर्गत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. जामीन मिळाल्यानंतरही पुणे पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने मुलाला डांबून ठेवल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला होता. ही याचिका हायकोर्टाने स्वीकारली असून मुलाला आत्याच्या ताब्यात देण्याचे निर्देश दिले आहेत. मुलाचे आई, वडील आणि आजोबा हे सध्या पोलीसांच्या कोठडीत आहेत. त्यामुळे मुलाला आत्याच्या ताब्यात देण्यात येणार आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.



आत्याने याचिका का केली?


कोर्टाने जामीन दिल्यानंतरही मुलाला अटक करण्यात आली. इथे सरळसरळ कायद्याच्या मर्यादेबाहेर जात कोर्टाने अटकेचे आदेश दिले आहेत. मुलगा १७ वर्षे ८ महिन्यांचा आहे, त्यामुळे अल्पवयीनच आहे यात दुमत नाही. सध्या त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आलं आहे. तिथे मुलाची नीट काळजी घेतली जात नसून तिथे त्याच्या जीवालाही धोका आहे. बालसुधारगृहाबाबत अनेक तक्रारी आहेत. मुलाचे आई- वडील, आजोबा सारेजण सध्या कोठडीत आहेत. याप्रकरणी दाद मागणाराच कुणी नाही, म्हणून आत्याच्या वतीने ही याचिका करण्यात आली.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.