टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, शुभमन गिल बनला कर्णधार

मुंबई: बीसीसीआयने झिम्बाब्वे दौऱ्यासाठी १५ सदस्यी भारतीय संघाची घोषणा सोमवारी करण्यात आली आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल करणार आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना ६ जुलैला हरारेमध्ये खेळवला जाईल.


रियान पराग, अभिषेक शर्मा, नितीश कुमार आणि तुषार देशपांडे यांना पहिल्यांदा संघात संधी दिली जात आहे. या खेळाडूंना बीसीसीआयने आयपीएल २०२४मध्ये शानदार कामगिरीचे बक्षीस दिले आहे.


झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या स्क्वॉडमध्ये वेगवान गोलंदाज मुकेश कुमार सगळ्यात वयस्कर खेळाडू आहे. यशस्वी जायसवाल, ऋतुराज गायकवाड, रिंकु सिंह, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई आणि कर्णधार शुभमन गिल आणि ध्रुव जुरेल या स्क्वॉडमध्ये अनुभवी खेळाडूंना सामील करण्यात आले आहे. जुरेलने वर्षाच्या सुरूवातीला कसोटीत पदार्पण केले होते.



भारत वि झिम्बाब्वे टी-२० वेळापत्रक


भारतीय संघाचा झिम्बाब्वे दौरा ६ जुलैपासून सुरू होत आहे. या दिवशी दोन्ही संघ हरारेमध्ये पहिल्या टी-२०मध्ये आमनेसामने असतील. दुसरा टी-२० सामना ७ जुलैला हरारेमध्ये असेल. तिसरा टी२० सामना १० जुलैला, चौथा १३ जुलैला तर पाचवा आणि शेवटचा टी-२० सामना १४ जुलैला खेळवला जाणार आहे.

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख