टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, शुभमन गिल बनला कर्णधार

  55

मुंबई: बीसीसीआयने झिम्बाब्वे दौऱ्यासाठी १५ सदस्यी भारतीय संघाची घोषणा सोमवारी करण्यात आली आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल करणार आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना ६ जुलैला हरारेमध्ये खेळवला जाईल.


रियान पराग, अभिषेक शर्मा, नितीश कुमार आणि तुषार देशपांडे यांना पहिल्यांदा संघात संधी दिली जात आहे. या खेळाडूंना बीसीसीआयने आयपीएल २०२४मध्ये शानदार कामगिरीचे बक्षीस दिले आहे.


झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या स्क्वॉडमध्ये वेगवान गोलंदाज मुकेश कुमार सगळ्यात वयस्कर खेळाडू आहे. यशस्वी जायसवाल, ऋतुराज गायकवाड, रिंकु सिंह, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई आणि कर्णधार शुभमन गिल आणि ध्रुव जुरेल या स्क्वॉडमध्ये अनुभवी खेळाडूंना सामील करण्यात आले आहे. जुरेलने वर्षाच्या सुरूवातीला कसोटीत पदार्पण केले होते.



भारत वि झिम्बाब्वे टी-२० वेळापत्रक


भारतीय संघाचा झिम्बाब्वे दौरा ६ जुलैपासून सुरू होत आहे. या दिवशी दोन्ही संघ हरारेमध्ये पहिल्या टी-२०मध्ये आमनेसामने असतील. दुसरा टी-२० सामना ७ जुलैला हरारेमध्ये असेल. तिसरा टी२० सामना १० जुलैला, चौथा १३ जुलैला तर पाचवा आणि शेवटचा टी-२० सामना १४ जुलैला खेळवला जाणार आहे.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी