Sharad Pawar Group : विधानसभा निवडणुकीत 'पिपाणी' चिन्ह यादीतून वगळा!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) फूट पडल्यानंतर मूळ चिन्ह 'घड्याळ' हे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीला मिळालं तर शरद पवार (Sharad Pawar) यांना निवडणूक आयोगाने (Election Commission) 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह दिलं. या चिन्हबदलामुळे शरद पवार गटाची मतं घटतील, असा अंदाज होता. मात्र, शरद पवारांनी १० जागा लढवून त्यातील ८ जागा जिंकत मोठा विजय मिळवला.


त्याच दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) यादीत असलेल्या 'पिपाणी' या चिन्हामुळे शरद पवार गटाला साताऱ्याच्या जागेवर फटका बसला. तसेच जिंकलेल्या ठिकाणीही मताधिक्य काही प्रमाणात कमी झाले. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत (VidhanSabha Election) हा धोका नको, म्हणून शरद पवार गटाने 'पिपाणी' चिन्ह यादीतून वगळावे, अशी निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे.


तुतारी आणि पिपाणी चिन्हे सारखी असल्यामुळे शरद पवार यांच्या उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला. तसेच राष्ट्रवादीची सातारा लोकसभेची सीटही चिन्हाच्या घोळामुळे गमवावी लागली, असा दावा शरद पवार गटाने केला होता. यामुळेच त्यांनी पिपाणीविरोधात निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. पिपाणी हे चिन्ह निवडणुकीच्या चिन्हाच्या यादीतून वगळण्यात यावं अशा मागणीचे पत्र निवडणूक आयोगाला लिहिले आहे.



मागणी मान्य न झाल्यास सुप्रीम कोर्टात जाणार


सातारा लोकसभेत पिपाणीच्या चिन्हाचा घोळ झाल्यामुळे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत पाटील यांचा निसटता पराभव झाला. याठिकाणी पिपाणी चिन्ह असलेल्या उमेदवाराला तब्बल ३७ हजार मते मिळाली. तसेच दिंडोरीमध्येही पिपाणी चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवाराला तब्बल १ लाख मते मिळाली होती. यामुळेच विधानसभेच्या बाबतीत शरद पवार गटाने सावध पावित्रा घेतला असून त्यांच्या मागणीबाबत निवडणूक आयोगाने योग्य निर्णय न घेतल्यास ते सुप्रीम कोर्टात जाणार आहेत.


Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार