Raj Thackeray : पुढच्या पिढीने जगायचं कसं? महाराष्ट्राचं काय होणार?

  130

जातीपातीच्या वादावर राज ठाकरे यांचा संतप्त सवाल


मुंबई : राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी (Maratha Vs OBC) संघर्ष पेटला आहे. दोन्ही समाजांच्या परस्परविरोधी मागण्यांमुळे राज्य सरकार (State government) कोंडीत सापडलं आहे. सामान्य माणसंच नव्हे तर राजकीय नेतेही या जातीपातीच्या वादावर टोकाची वक्तव्ये करत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी 'पुढच्या पिढीने जगायचं कसं? महाराष्ट्राचं काय होणार?', असा संतप्त सवाल उपस्थित केला. निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आज राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी राज्यातील जातीय आरक्षणावरून (Caste reservation) सुरू असलेल्या वादावर आपली भूमिका मांडली.


राज ठाकरे म्हणाले, मी इतकी वर्षे सर्व समाजाला सांगतोय, या जातीपातीच्या वादातून काही निष्पन्न होणार नाही. हे सगळे पुढारी जातीपातीत द्वेष पसरवून फक्त मते हातात घेतील. आता लहान लहान मुलं जातीपातीवरून एकमेकांशी बोलतायेत. हे शाळा कॉलेजपर्यंत विष जाईल हे मी आधी सांगितले होते. जातीपातीचं विष कालवणाऱ्या लोकांना महाराष्ट्रानं दूर ठेवलं पाहिजे, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं.


पुढे ते म्हणाले, जातीय विष महाराष्ट्रात कधीही नव्हते. कितीही आवडणारा पक्ष असेल किंवा नेता असेल पण असं जर ते करणार असतील तर पुढच्या पिढीने जगायचं कसं? महाराष्ट्राचं काय होणार? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. त्याशिवाय ज्याप्रकारे उत्तर प्रदेश, बिहारमध्ये सुरू आहे तसं महाराष्ट्रात यावरून रक्तपात होईल अशी भीती राज ठाकरेंनी वर्तवली.



मराठा-ओबीसी आरक्षणावरून वाद


राज्यात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील सातत्याने आंदोलन करत आहेत. तर ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे राज्यात सध्या मराठा-ओबीसी आरक्षणाचा वाद चांगलाच पेटला आहे. त्यात जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला १३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे.

Comments
Add Comment

पुढील दोन दिवस महत्त्वाचे! मुंबई, पुणे, दक्षिण कोकणसह राज्याच्या 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता, IMDचा ॲलर्ट

मुंबई : मुंबईमध्ये शुक्रवारी पावसाची उपस्थिती दिलासादायक होती. वीकेंडला एक-दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

दिलासादायक! मुंबईत कोविड शून्य रुग्ण नोंद

कोविड सदृश्य अथवा तत्सम लक्षणे आढळल्यास कृपया योग्य ती काळजी घ्यावी : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे

रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेचा रविवार २९ जून २०२५ रोजी मेगाब्लॉक आहे. ब्लॉक काळात उपनगरीय रेल्वे सेवेच्या

कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडली लोडेड पिस्टल, खेळणी समजून मुलाने केला गोळीबार

12 वर्षांच्या मुलाकडून चुकून हवेत गोळीबार मुंबई:  दहिसर पूर्वच्या वैशाली नगर येथून एक धक्कादायक माहिती समोर येत

मध्य -हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेवर येत्या रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा

अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे पालक संतप्त; विद्यार्थी तणावाखाली

मुंबई : शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवसापासून घातलेल्या गोधळानंतर पहिली यादीही