Mumbai Goa Highway : परशुराम घाटात भिंत कोसळली तर जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली!

रत्नागिरीत पावसाचा धुमाकूळ; नागरिकांचे जनजीवन विस्कळीत


रत्नागिरी : राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत आहे. तर काही ठिकाणी मात्र नागरिकांना अजूनही दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यातच रत्नागिरीमध्ये (Ratnagiri News) गेले दोन दिवस सतत पडत असलेल्या पावसाने चांगलेच रौद्र रुप दाखवले आहे. जिल्ह्यातील खेड तालुक्यात जगबुडी नदीने धोकादायक पातळी ओलांडली आहे. तर दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात मुख्य रस्त्याची संरक्षक भिंत कोसळल्याने याठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीसह खेड परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नदीपात्रात कमालीची वाढ होऊ लागली आहे. जगबुडी नदीची पाणीपातळी ५.२५ मीटर इतकी वाढली आहे. कोकणातील या पट्ट्यातील पावसाचा पूर्वानुभव लक्षात घेता प्रशासनाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर खेड व चिपळूण परिसरात एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे.



भोईवाडीत घरावर संरक्षक भिंत कोसळली


खेड तालुक्यातील सोनगाव मधल्या भोईवाडीत घरावर संरक्षक भिंत कोसळून घराचे नुकसान झाले आहे. या भागात मुसळधार पाऊस सुरू असून जमीन खचून संरक्षक भिंत थेट पुष्पा पारधी यांच्या घरावर कोसळली. त्यामुळे पारधी यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच गुरुवारपासून अजूनही जोरदार पाऊस सुरू असल्याने ग्रामीण भागात जमीन खचण्याचे प्रकार देखील सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.



परशुराम घाट रस्ता धोकादायक बनला


मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील मुख्य रस्त्याची संरक्षक भिंत कोसळल्याने मुख्य रस्त्याला धोका निर्माण झाला आहे. सुमारे दीड किलोमीटर लांबीची ही संरक्षक भिंत कोसळल्याने मातीचे ढिगारे गटारात वाहू लागले आहेत.

Comments
Add Comment

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे