Mumbai Goa Highway : परशुराम घाटात भिंत कोसळली तर जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली!

  101

रत्नागिरीत पावसाचा धुमाकूळ; नागरिकांचे जनजीवन विस्कळीत


रत्नागिरी : राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत आहे. तर काही ठिकाणी मात्र नागरिकांना अजूनही दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यातच रत्नागिरीमध्ये (Ratnagiri News) गेले दोन दिवस सतत पडत असलेल्या पावसाने चांगलेच रौद्र रुप दाखवले आहे. जिल्ह्यातील खेड तालुक्यात जगबुडी नदीने धोकादायक पातळी ओलांडली आहे. तर दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात मुख्य रस्त्याची संरक्षक भिंत कोसळल्याने याठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीसह खेड परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नदीपात्रात कमालीची वाढ होऊ लागली आहे. जगबुडी नदीची पाणीपातळी ५.२५ मीटर इतकी वाढली आहे. कोकणातील या पट्ट्यातील पावसाचा पूर्वानुभव लक्षात घेता प्रशासनाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर खेड व चिपळूण परिसरात एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे.



भोईवाडीत घरावर संरक्षक भिंत कोसळली


खेड तालुक्यातील सोनगाव मधल्या भोईवाडीत घरावर संरक्षक भिंत कोसळून घराचे नुकसान झाले आहे. या भागात मुसळधार पाऊस सुरू असून जमीन खचून संरक्षक भिंत थेट पुष्पा पारधी यांच्या घरावर कोसळली. त्यामुळे पारधी यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच गुरुवारपासून अजूनही जोरदार पाऊस सुरू असल्याने ग्रामीण भागात जमीन खचण्याचे प्रकार देखील सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.



परशुराम घाट रस्ता धोकादायक बनला


मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील मुख्य रस्त्याची संरक्षक भिंत कोसळल्याने मुख्य रस्त्याला धोका निर्माण झाला आहे. सुमारे दीड किलोमीटर लांबीची ही संरक्षक भिंत कोसळल्याने मातीचे ढिगारे गटारात वाहू लागले आहेत.

Comments
Add Comment

नागपूर - पुणे वंदे भारत या दिवसापासून धावणार

नागपूर : नागपूर (अजनी) ते पुणे आणि पुणे ते नागपूर (अजनी) अशी वंदे भारत एक्सप्रेस रविवार १० ऑगस्ट २०२५ पासून धावणार

एसटी महामंडळाच्या राखी पौर्णिमेसाठी ४० जादा गाड्या कार्यरत

लाडक्या बहिणींसाठी ८, ९ आणि ११ ऑगस्ट रोजी बसची विशेष सेवा पेण(स्वप्नील पाटील) : आधीच लाडक्या बहिणींना एसटी

राज्यातील ५ ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

नियमितपणे आढावा, समन्वय साधणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई : राज्यातील पाच

माधुरी लवकरच कोल्हापूरला परतणार!

कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश; माधुरीला परत पाठवण्याबाबत वनताराकडून आश्वासन कोल्हापूर: कोल्हापूरकरांच्या

उत्तराखंडमधील ढगफुटीत अडकले महाराष्ट्रातील ५१ पर्यटक

सर्व पर्यटक सुखरूप असल्याची राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती मुंबई : उत्तराखंडमधील राज्यातील उत्तरकाशी

Hingoli Train Fire : हिंगोली रेल्वे स्थानकावर उभ्या बोगीला भीषण आग; संपूर्ण बोगी जळून खाक

हिंगोली : हिंगोली शहरातील रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका जुन्या बोगीला बुधवारी (६ ऑगस्ट) सकाळी सुमारे ८:३०