Tea Price Hike : 'गरम चाय की प्याली' महागली!

चहाप्रेमींना द्यावे लागणार जास्तीचे पैसे; नेमके कारण काय?


मुंबई : सकाळचा वाफाळलेला चहा, हातात पेपर असे निवांत क्षण सर्वांनाच हवे असतात. आपापल्या परीने प्रत्येक जण कडक चहासोबत सकाळची सुरुवात करत असतो. भारतातील लोकांना चहा प्यायला आवडतो. चहाचे उत्पादन (Tea production) आणि वापर या दोन्ही बाबतीत भारत (India) हा अग्रगण्य देश आहे. चहा उत्पादक देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक तर चीन पहिल्या क्रमांकावर येतो. जगभरातील देशांमध्ये प्रसिद्ध आणि स्वस्त पेय असण्याव्यतिरिक्त, चहा लोकांच्या जीवनात इतका एकरूप झाला आहे की त्याला वेगळे करणे अशक्य आहे. मात्र यंदा चहा महागल्याने (Tea Price Hike) प्रत्येक घोटासोबत लागणारे चटके अधिक तीव्र झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, भारतामध्ये चहाप्रेमींची संख्या मोठया प्रमाणात आहे. परंतु यंदा चहा पिणेही खिशाला जड जाणार असल्याचे दिसून येत आहे. उत्तर भारतीय चहा उद्योगाला प्रतिकूल हवामानामुळे चालू पीक वर्षाच्या जूनपर्यंत सहा कोटी किलोग्रॅम उत्पादनाची कमतरता भासत आहे. गेल्या वर्षीची तुलना करता यावेळी देशातील चहाचे उत्पादन कमी झाल्याचे माहिती मिळत आहे. त्यामुळे चहाचे कमी होणारे उत्पादन उत्पादकांच्या महसुलावर परिणाम करेल आणि चहाच्या किमती आणखी वाढतील, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.



सूर्यप्रकाशाचा अभावामुळे उत्पादनात घट


उत्तर भारतीय चहा उद्योगात गुंतलेली आसाम आणि पश्चिम बंगाल ही राज्ये धोकादायक परिस्थितीला तोंड देत आहेत. मे महिन्यातील अतिउष्णता आणि पावसाचा अभाव, अतिवृष्टी आणि सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे चहाच्या उत्पादनावर वाईट परिणाम झाला आहे.



चहाचे उत्पादन ६ कोटी किलोने कमी


टी असोसिएशन ऑफ इंडियाचे (ΤΑΙ) अध्यक्ष संदीप सिंघानिया यांनी अंदाज व्यक्त केला आहे की, जूनपर्यंत चहा पिकाचे एकत्रित नुकसान गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा कोटी किलोग्रॅम असू शकते.



'इतक्या' टक्क्यांनी उत्पादन कमी झाल्याचा अंदाज


टी बोर्ड ऑफ इंडियाने काढलेल्या आकडेवारीवरून, एप्रिल २०२४ पर्यंत आसाममध्ये चहाचे उत्पादन सुमारे ८ टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये १३ टक्क्यांनी घटले आहे. त्याचबरोबर आसाममधील चहांच्या बागांमध्ये मे महिन्यातील उत्पादन २० टक्के तर पश्चिम बंगालमधील ४० टक्क्यांनी कमी झाल्याचा अंदाज आहे.

Comments
Add Comment

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि

८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी बांधकामात मशि‍दीचा अडथळा

कोलकाता: सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असणाऱ्या कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ