मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग महाड उपविभाग रुंदीकरणाच्या कामाची पूर्तता

लोणेरे येथील पूल व वडपाले रस्त्याची कामे लवकरच लागणार मार्गी


महाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Goa Highway) मागील तीन वर्षांपासून सुरू रुंदीकरणाच्या कामाची पूर्तता महाड उपविभागात जवळपास पूर्ण झाली असून लोणेरे येथील उड्डाणपुलाचे व वडपाले येथील रस्त्याचे काम येत्या महिन्याभरात पूर्ण होईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता अमोल महाडकर यांनी दिली आहे.


महाड उपविभागात टेमपाले ते धामणदेवी पर्यंत एकूण ३९ किलोमीटर लांबीच्या मार्गाची निर्मिती लार्सन अँड टुब्रो कंपनीकडून करण्यात आली . यामध्ये दोन मोठ्या पूलांसह अकरा लहान पूलांचा समावेश आहे. महाड उपविभागातील या कामासाठी सुमारे ६५० कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती श्री अमोल महाडकर यांनी देऊन या दरम्यान प्रलंबित असलेल्या वनखात्याकडून जमिनी संदर्भातील परवानगीची कामे पूर्ण झाल्याने दासगाव साहिल नगर परिसरात राहिलेली संबंधित कामे पूर्णत्वास गेल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. या मार्गावरील वृक्षारोपणासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाला सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी वर्ग केला असल्याची माहिती दिली, तसेच यासंदर्भात वनखात्यामार्फत मार्गांवर वृक्षारोपणाची कामे सुरू झाली असून खड्डे मारण्यास प्रारंभ झाल्याचे त्यांनी सांगितले.


शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय महामार्गावर वड, पिंपळ, आंबा, जांभूळ,यासारख्या झाडांची लागवड करण्यात येणार असल्याचे सांगून या संदर्भात वनखात्याकडे ही संपूर्ण जबाबदारी दिल्याची माहिती दिली. एकूणच मागील सात दशकांपेक्षा जास्त काळापासून कोकणातील जनतेची असलेली रस्ता रुंदीकरणाची मागणी हजारो नागरिकांच्या झालेल्या आंदोलना पश्चात मागील तीन वर्षापासून सुरू होऊन ती आता जवळपास पूर्णत्वास गेली आहे. मागणीची पूर्तता झाल्याने परिसरातील नागरिकांकडून राष्ट्रीय महामार्ग विभाग संबंधित मंत्री नितीन गडकरी व बांधकाम विभागाच्या राज्यस्तरीय अधिकारी वर्गाला धन्यवाद देण्यात येत आहेत.

Comments
Add Comment

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

धक्कादायक! एसटीचे ७ कर्मचारी दारू पिऊन ड्युटीवर!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कारवाईचा बडगा मुंबई : अचानक केलेल्या तपासणीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना