Vidhanparishad Election : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर!

कधी होणार मतदान?


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) धामधुमीनंतर अवघ्या राज्याचे लक्ष विधानपरिषद निवडणुकांकडे (Vidhanparishad Election) लागले होते. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक आयोग (Election Commission) कधी निवडणूक घोषित करणार याची सर्वजण वाट पाहत होते. राजकीय पक्षांनी या जागांसाठी उमेदवारांची चाचपणी देखील सुरु केली. यानंतर अखेर ११ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून त्याचे वेळापत्रक समोर आले आहे.


निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील वेळापत्रक असणार आहे,


२५ जून - निवडणूक आयोगाकडून अधिसचूना जारी केली जाईल.
२ जुलै - उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख.
३ जुलै - अर्जांची छानणी केली जाईल.
५ जुलै - उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख.
१२ जुलै - मतदान पार पडेल व त्याच दिवशी निकाल जाहीर होईल.


१२ जुलै रोजी या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान होईल. सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत यासाठी मतदान करता येईल. १२ जुलै रोजीच मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.



कोणते आमदार होणार निवृत्त?


विधानसभेच्या आमदारांनी मतदानाच्या माध्यमातून नियुक्त केलेल्या विधानपरिषदेच्या ११ आमदारांचा कार्यकाळ येत्या २७ जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर अन्य व्यक्तींची आमदार म्हणून निवड केली जाईल. २७ जुलै रोजी कार्यकाळ संपणाऱ्या आमदारांमध्ये विजय गिरकर, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील (भाजप), महादेव जानकर (भाजप मित्र पक्ष), अनिल परब (शिवसेना ठाकरे गट), मनीषा कायंदे (शिवसेना शिंदे गट), डॉ. वजाहत मिर्झा व डॉ. प्रज्ञा सातव (काँग्रेस), बाबाजानी दुराणी (राष्ट्रवादी), जयंत पाटील (शेकाप) या ११ आमदारांचा समावेश आहे.


Comments
Add Comment

महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी वातावरण पोषक

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन मुंबई  : राज्याने जहाज बांधणी, दुरुस्ती, पुनर्वापर आणि

Navneet Rana : भाजप नेत्या नवनीत राणांना अश्लील शिवीगाळ, पत्राद्वारे 'गँगरेप' आणि 'जीवे मारण्याची' धमकी; राजापेठ पोलिसांकडून तपास सुरू

अमरावती : भाजप नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा ( Navneet Rana) यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर

दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात पुन्हा वाढ

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांवर वाढीव भार अलिबाग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने

पाऊस थांबल्यानंतर तीन महिन्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल

चिपळूण : पाऊस थांबल्यानंतर तीन महिन्यांत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास माजी केंद्रीय

लोकसेवकाचा भ्रष्टाचार! तक्रारीची चौकशी करण्यासाठी मागितली लाच... अन् अडकला जाळ्यात

नागपूर: मासेमारीचा करारनामा संस्थेने रद्द का केला? या प्रकरणी चौकशी करण्यात यावी म्हणून अर्ज केलेल्या

जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टसचा महाराष्ट्रासोबत करार

देशातले पहिले राज्य; २ अब्ज डॉलरची गुंतवणूक मुंबई : जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टस ग्रुपचा महाराष्ट्र