Pune Vidhansabha : पुण्याच्या जागांवरुन मविआ आघाडीत होणार बिघाडी!

ठाकरे-पवारांमध्ये नवा वाद रंगण्याची शक्यता


पुणे : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) ३० जागा जिंकत महाराष्ट्रात चांगली कामगिरी केली. परंतु हीच आघाडी विधानसभेतही (Vidhansabha Election) एकनिष्ठ राहणार का, असा सवाल मविआची सद्यपरिस्थिती पाहता उपस्थित होत आहे. मविआच्या नेत्यांनी ही निवडणूक एकत्रच लढवणार असल्याचे सांगितले असले तरी अंतर्गत वाद मात्र चव्हाट्यावर आल्यावाचून राहत नाहीत. त्यातच आता पुण्याच्या जागांवरुन (Pune vidhansabha) ठाकरे गटात (Thackeray Group) व राष्ट्रवादी शरद पवार गटात (NCP Sharad Pawar group) नवा वाद रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण दोन्ही पक्षांकडून पुण्याच्या मतदारसंघांवर दावा ठोकण्यात आला आहे.


पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहर कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली व या बैठकीनंतर पुणे शहरातील ८ पैकी ६ विधानसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार हवा असा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला. पुण्यातील आठही मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला, शिवाजीनगर, पर्वती, पुणे कँटोन्मेंट या सहा मतदारसंघांत शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येणार हा विश्वास सर्वानुमते व्यक्त करण्यात आला.


तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटानेही पुण्यातील सहा मतदारसंघावर दावा केला आहे. कोथरूड, पर्वती, वडगाव शेरी, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा या मतदारसंघावर ठाकरे गटाकडून दावा करण्यात आला आहे. यांतील चार जागांवर दोन्ही गटाने दावा ठोकला असून त्यामुळे दोघांमध्ये वाद रंगण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या जागावाटपावेळी पुण्यातील या मतदारसंघावरुन तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागावाटप लांबू शकते. येत्या काळात मविआत कोण सांमजस्याची भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य