Pandharpur News : पंढरपूरकडे जाणारा पालखी मार्ग खचला!

Share

प्रशासनाच्या कामाबाबत वारकऱ्यांचा असंतोष

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी शासनाकडून आळंदी ते पंढरपूर असा हजारो कोटी रुपये खर्च करून नव्याने मार्ग तयार करण्यात आला होता. मात्र वेळापूर ते वाखरी मार्गावर दसूर येथे हा मार्ग खचला असल्याची माहिती मिळत आहे. अवघ्या दीड वर्षात सदर काम गुणवत्तापूर्ण न झाल्याने पालखी मार्ग खचल्याने प्रशासनाच्या कामावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरीची वारी सुखकर व्हावी यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आळंदी ते पंढरपूर असा नवा पालखी मार्ग तयार केला होता. मात्र माळशिरस तालुक्यातील तोंडले बोंडले ते वेळापूर दरम्यान २०० मीटर रस्ता ६० फूट खोल खचला आहे. या घटनेमुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

पालखी मार्गावरील हा महामार्ग खचल्याची माहिती मिळताच, तातडीने प्रशासनाने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. आषाढी यात्रा काळात कोणताही धोका होऊ नये यासाठी प्रशासन गंभीर असले तरी इतक्या अल्पावधीत हा मार्ग कसा खचू लागला असा प्रश्न वारकरी व भाविकांतून उपस्थित होऊ लागला आहे. .

प्रशासनाकडून काम सुरू

पालखी मार्ग खचल्याच्या ठिकाणी काम सुरू असल्याचे फलक लावून या भागातील माती व मुरूम काढण्यात आले आहे. पावसाळा सुरू असतानाही आता या भागाची दुरुस्ती तातडीने केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सध्या सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आषाढीसाठी पालखी मार्गावर कोणत्याही प्रकारची अडचण किंवा त्रास होता कामा नये असे आदेशच प्रशासनाला दिले आहेत. त्यासाठी पंढरपूरहून वेळापूरकडे जाणारी एक लेन ३ किलोमीटरपर्यंत बंद करण्यात आली आहे.

वारकऱ्यांमध्ये असंतोष

आषाढी वारीला पुढील काही दिवसांत सुरुवात होणार असून पालखी प्रस्थानाला काही दिवसच उरले आहेत. त्यामुळे, जिल्हा प्रशासनाकडून आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू आहे. मात्र, अशा पद्धतीने नव्याने बनविलेला पालखी मार्ग खचल्याने वारकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मानाच्या पालख्या पंढरपूरकडे करणार प्रस्थान ठेवणार असून त्यापूर्वीच प्रशासनाला ही कामे पूर्ण करावी लागणार आहेत.

Recent Posts

पंतप्रधान मोदी २२-२३ एप्रिलला सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…

25 minutes ago

बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर

ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…

56 minutes ago

अनधिकृत इमारतींची संख्या ही ११० ने वाढली

पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…

2 hours ago

जलवाहिनी फुटल्याने २४ तास ‘पाणीबाणीचे’ मुंबईकरांसमोर संकट

काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…

2 hours ago

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…

3 hours ago

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

5 hours ago