Sunetra Pawar : ना प्रफुल पटेल, ना सुनील तटकरे! केंद्रात मंत्रीपदासाठी 'वहिनीं'ची लागणार वर्णी?

  166

राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण


मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचा (NCP Ajit Pawar group) महाराष्ट्रातून केवळ एक खासदार निवडून आल्यामुळे केंद्रात राष्ट्रवादीला मंत्रीपद मिळणार नसल्याची शक्यता होती. अजित पवार यांनी दिल्लीत ठाण मांडूनही दिलासा मिळाला नव्हता. मात्र, राज्यसभेतून प्रफुल पटेल (Praful Patel) हे राष्ट्रवादीचे खासदार असल्याने एक मंत्रीपद अजितदादांना मिळू शकते, अशा चर्चा होत्या. त्यातच आता प्रफुल पटेल यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी राष्ट्रवादीकडून ज्या व्यक्तीची वर्णी लागेल त्यालाच केंद्रात मंत्रीपद देखील मिळणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचं नाव पुढे आलं आहे.


प्रफुल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेच्या रिक्त जागेवर कोणाची वर्णी लागणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. या जागेसाठी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. तसेच सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागल्यानंतर मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार या आज राज्यसभेसाठी अर्ज भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या राज्यसभेच्या जागेसाठी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे या जागेवर कोणाला उमेदवारी मिळणार, हे दुपारी बारा वाजल्यानंतर स्पष्ट होणार आहे.


राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांनी पत्र लिहून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेत पाठवण्याची मागणी केली होती. दरम्यान, सुनेत्रा पवार यांना मंत्रिपदाच्या मिळाल्यास प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.