Sunetra Pawar : ना प्रफुल पटेल, ना सुनील तटकरे! केंद्रात मंत्रीपदासाठी 'वहिनीं'ची लागणार वर्णी?

राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण


मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचा (NCP Ajit Pawar group) महाराष्ट्रातून केवळ एक खासदार निवडून आल्यामुळे केंद्रात राष्ट्रवादीला मंत्रीपद मिळणार नसल्याची शक्यता होती. अजित पवार यांनी दिल्लीत ठाण मांडूनही दिलासा मिळाला नव्हता. मात्र, राज्यसभेतून प्रफुल पटेल (Praful Patel) हे राष्ट्रवादीचे खासदार असल्याने एक मंत्रीपद अजितदादांना मिळू शकते, अशा चर्चा होत्या. त्यातच आता प्रफुल पटेल यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी राष्ट्रवादीकडून ज्या व्यक्तीची वर्णी लागेल त्यालाच केंद्रात मंत्रीपद देखील मिळणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचं नाव पुढे आलं आहे.


प्रफुल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेच्या रिक्त जागेवर कोणाची वर्णी लागणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. या जागेसाठी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. तसेच सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागल्यानंतर मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार या आज राज्यसभेसाठी अर्ज भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या राज्यसभेच्या जागेसाठी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे या जागेवर कोणाला उमेदवारी मिळणार, हे दुपारी बारा वाजल्यानंतर स्पष्ट होणार आहे.


राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांनी पत्र लिहून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेत पाठवण्याची मागणी केली होती. दरम्यान, सुनेत्रा पवार यांना मंत्रिपदाच्या मिळाल्यास प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

अवयव प्रत्यारोपणासाठी देशव्यापी एकसमान धोरणाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

दानकर्त्यांची प्रत्यारोपणानंतर वैद्यकीय काळजी बंधनकारक… मुंबई : देशभर अवयव प्रत्यारोपणासाठी एकसमान व

मालाड, कांदिवली, माटुंगा, परळमधील उद्याने, क्रीडांगणाचा होणार विकास

महापालिकेने मागवली २६ कोटींची निविदा मुंबई (खास प्रतिनिधी) : मालाड (पूर्व), येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे

मुंबईत २०० पेक्षा वायू गुणवत्ता निर्देशांक असल्यास उद्योग आणि बांधकामे बंद करा

महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांचा गय

मुंबईत निवडणुकीची चाहूल; राज्य सरकारचा पुनर्विकासाला चालना देणारा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईतील बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राज्य सरकारने नागरिकांना थेट लाभ

मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल

मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार ; कारमध्ये झाडल्या गोळ्या

मुंबई : मुंबईत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप परिसरातील एका व्यावसायिकांवर हल्ला झाला.