Sunetra Pawar : ना प्रफुल पटेल, ना सुनील तटकरे! केंद्रात मंत्रीपदासाठी 'वहिनीं'ची लागणार वर्णी?

राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण


मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचा (NCP Ajit Pawar group) महाराष्ट्रातून केवळ एक खासदार निवडून आल्यामुळे केंद्रात राष्ट्रवादीला मंत्रीपद मिळणार नसल्याची शक्यता होती. अजित पवार यांनी दिल्लीत ठाण मांडूनही दिलासा मिळाला नव्हता. मात्र, राज्यसभेतून प्रफुल पटेल (Praful Patel) हे राष्ट्रवादीचे खासदार असल्याने एक मंत्रीपद अजितदादांना मिळू शकते, अशा चर्चा होत्या. त्यातच आता प्रफुल पटेल यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी राष्ट्रवादीकडून ज्या व्यक्तीची वर्णी लागेल त्यालाच केंद्रात मंत्रीपद देखील मिळणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचं नाव पुढे आलं आहे.


प्रफुल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेच्या रिक्त जागेवर कोणाची वर्णी लागणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. या जागेसाठी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. तसेच सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागल्यानंतर मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार या आज राज्यसभेसाठी अर्ज भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या राज्यसभेच्या जागेसाठी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे या जागेवर कोणाला उमेदवारी मिळणार, हे दुपारी बारा वाजल्यानंतर स्पष्ट होणार आहे.


राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांनी पत्र लिहून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेत पाठवण्याची मागणी केली होती. दरम्यान, सुनेत्रा पवार यांना मंत्रिपदाच्या मिळाल्यास प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

मुंबईत घर घेण्याचं स्वप्न स्वप्नच रहाणार, ४२६ फ्लॅट्सची सोडत, पण किंमती आवाक्याबाहेर? वाचा A टू Z

मुंबईत ‘घर’ का परवडेना? किंमत ५४ लाखांपासून १ कोटीपर्यंत! मग 'अत्यल्प व अल्प उत्पन्न' गटाचा नेमका अर्थ काय? मुंबई :

मुंबईमध्ये उभारणार आलिशान 'मरिना'! समुद्र पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई बंदर प्राधिकरणाचे महत्त्वाचे पाऊल

मुंबई: मुंबईला लाभलेल्या अथांग समुद्राचा आणि समुद्रकिनाऱ्यांचा, समुद्राशी निगडित उपक्रमांसाठी वापर

मुंबईत इंडिया मेरिटाईम वीक परिषदेचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : दशकभरात केंद्र सरकारने मेरिटाईम अर्थात सागरी अर्थव्यवस्थेत केलेल्या धोरणात्मक सुधारणांमुळे आज भारत

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेची झुंजार खेळी! १५९ धावांची खेळी करून रहाणेचं मोठं स्टेटमेंट; रोहित-विराटचा दाखला देत टीम इंडियात पुनरागमनाचा ठोकला दावा

मुंबई : रणजी ट्रॉफी २०२५-२६ (Ranji Trophy 2025-26) हंगामाच्या दुसऱ्या राऊंडमध्ये मुंबई संघ (Mumbai Team) छत्तीसगड (Chhattisgarh) विरुद्ध आपला

Kabutarkhana : 'गरज पडल्यास शस्त्र'...कबुतरखान्यांवरील बंदीवरून जैन समाज पुन्हा आक्रमक; जैन मुनींचा थेट 'आमरण उपोषणाचा' इशारा

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे जैन समाज (Jain Community) आक्रमक झाला आहे. या

बेस्टच्या ताफ्यातील बस क्रमांक १८६४ ला भावपूर्ण निरोप

मुंबई  :  मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या बेस्ट उपक्रमातील शेवटची मोठ्या आकाराची JNNURM बसगाडी