Sunetra Pawar : ना प्रफुल पटेल, ना सुनील तटकरे! केंद्रात मंत्रीपदासाठी 'वहिनीं'ची लागणार वर्णी?

  178

राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण


मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचा (NCP Ajit Pawar group) महाराष्ट्रातून केवळ एक खासदार निवडून आल्यामुळे केंद्रात राष्ट्रवादीला मंत्रीपद मिळणार नसल्याची शक्यता होती. अजित पवार यांनी दिल्लीत ठाण मांडूनही दिलासा मिळाला नव्हता. मात्र, राज्यसभेतून प्रफुल पटेल (Praful Patel) हे राष्ट्रवादीचे खासदार असल्याने एक मंत्रीपद अजितदादांना मिळू शकते, अशा चर्चा होत्या. त्यातच आता प्रफुल पटेल यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी राष्ट्रवादीकडून ज्या व्यक्तीची वर्णी लागेल त्यालाच केंद्रात मंत्रीपद देखील मिळणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचं नाव पुढे आलं आहे.


प्रफुल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेच्या रिक्त जागेवर कोणाची वर्णी लागणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. या जागेसाठी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. तसेच सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागल्यानंतर मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार या आज राज्यसभेसाठी अर्ज भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या राज्यसभेच्या जागेसाठी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे या जागेवर कोणाला उमेदवारी मिळणार, हे दुपारी बारा वाजल्यानंतर स्पष्ट होणार आहे.


राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांनी पत्र लिहून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेत पाठवण्याची मागणी केली होती. दरम्यान, सुनेत्रा पवार यांना मंत्रिपदाच्या मिळाल्यास प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना

मरिनड्राईव्हच्या समुद्रात तरुणीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा

मुंबईत यंदा २७५ कृत्रिम तलावांची निर्मिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून

समुद्र किनाऱ्यांची कचऱ्यातून सुटका

मुसळधार पावसामुळे चौपाट्यांवर पसरलेला कचरा साफ मागील नऊ दिवसांमध्ये ९५० मेट्रीक टन कचऱ्याची लावली

सेंच्युरी मिलची जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी मिळण्याचा मार्ग मोकळा

सेंच्युरी मिल व्यवस्थापनाने जागा देणार; गिरणी कामगार संघर्ष समितीच्या मागणीला यश मुंबई : वरळी येथील सेंच्युरी