Mumbi Local : मध्य रेल्वेवर नेमके चाललंय काय! वाहतुकीचा खेळखंडोबा सुरुच

प्रवाशांचा प्रशासनावर तीव्र संताप


मुंबई : मध्य रेल्वेने (Central Railway) घेतलेल्या तीन दिवसीय मेगाब्लॉक (Megablock) नंतरही एकाच आठवड्यात दोन ते तीन वेळा वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रवाशांना याचा मोठा फटका बसला होता. त्यानंतर आता पुन्हा मध्य रेल्वेची वाहतूक सेवा कोलमडली आहे. आज सकाळपासूनच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह इतर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.


मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी भांडूप आणि विक्रोळी रेल्वे स्टेशनदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे. विक्रोळी येथे फास्ट ट्रॅकवर झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सकाळी ८च्या सुमारास रेल्वे प्रशासनाने हा बिघाड दुरुस्त केला. मात्र तरीही लोकल २० ते २५ मिनिटे उशीराने धावत आहेत. त्यामुळे सकाळ सकाळीच प्रवाशांना याचा मोठा फटका बसला आहे.


दरम्यान, एकीकडे पावसाच्या सरी तर दुसरीकडे ,मध्य रेल्वेवरील वाहतूकीचा खेळखंडोबा सुरुच असल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा होणार उपलब्ध

मुंबई : कर्करोगाचे वाढते प्रमाण व कर्करोग उपचाराचे गांभीर्य विचारात घेता राज्यातील जनतेस सर्वसमावेशक कर्करोग

महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश

मुंबई : देशभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी

डिजिटल गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ, सेक्सटॉर्शन आणि सायबर बुलिंगमधून मुंबईकरांची १२७ कोटींची लूट

मुंंबई: सेक्सटॉर्शन आणि सायबर बुलिंगमुळे मुंबईकरांना १२७ कोटी रुपयांना लुबाडले असल्याचा आकडा पोलीस तपासातून

महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ अतिरिक्त उपनगरी गाड्या

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन २०२५ निमित्त प्रवाशांच्या

ज्येष्ठांचा सन्मान करून साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांप्रती बांधिलकी जपणारा

मुंबईतील पाणी कपात घेतली मागे, काय आहे कारण..

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम प्रस्तावित आहे.