Mumbi Local : मध्य रेल्वेवर नेमके चाललंय काय! वाहतुकीचा खेळखंडोबा सुरुच

  52

प्रवाशांचा प्रशासनावर तीव्र संताप


मुंबई : मध्य रेल्वेने (Central Railway) घेतलेल्या तीन दिवसीय मेगाब्लॉक (Megablock) नंतरही एकाच आठवड्यात दोन ते तीन वेळा वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रवाशांना याचा मोठा फटका बसला होता. त्यानंतर आता पुन्हा मध्य रेल्वेची वाहतूक सेवा कोलमडली आहे. आज सकाळपासूनच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह इतर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.


मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी भांडूप आणि विक्रोळी रेल्वे स्टेशनदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे. विक्रोळी येथे फास्ट ट्रॅकवर झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सकाळी ८च्या सुमारास रेल्वे प्रशासनाने हा बिघाड दुरुस्त केला. मात्र तरीही लोकल २० ते २५ मिनिटे उशीराने धावत आहेत. त्यामुळे सकाळ सकाळीच प्रवाशांना याचा मोठा फटका बसला आहे.


दरम्यान, एकीकडे पावसाच्या सरी तर दुसरीकडे ,मध्य रेल्वेवरील वाहतूकीचा खेळखंडोबा सुरुच असल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची