BMS Admission : ‘बीएमएस’ प्रवेश कोलमडणार

  82

मुंबई : सीईटीमार्फत (CET) बीएमएस, बीसीए अभ्यासक्रमांचे प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विद्यापीठांनी या अभ्यासक्रमांचे नामांतर करून सीईटीविनाच विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश दिले आहेत. त्यामुळे एआयसीटीईची मान्यता असूनही अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत विद्यापीठांकडून घालण्यात आलेल्या गोंधळामुळे अनेक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. तसेच नामांतर केलेल्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक भवितव्य अडचणीचे ठरणार आहे. बीएमएस व बीसीए या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सीईटी बंधनकारक केली आहे.


यासाठी सीईटीकडे ५६ हजार ७९० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. एआयसीटीईची मान्यता असलेल्या संस्थांमध्ये सुमारे १ लाखाहून अधिक जागा असण्याची शक्यता आहे. मात्र एआयसीटीईचे कठोर निकष आणि सीईटी कक्षाच्या नियंत्रणातून सुटका होण्यासाठी मुंबई विद्यापीठाने बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अभ्यासक्रमाच्या नावात बदल करण्यास परवानगी दिली आहे.

Comments
Add Comment

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.