Modi cabinet : मोदी मंत्रिमंडळ स्थापनेनंतर राज्यांना मिळाला निधी

  35

उत्तर प्रदेशला मिळाले सर्वांधिक २५ हजार कोटी


नवी दिल्ली : मोदी ३.० सरकारच्या मंत्रिमंडळाच्या (Modi cabinet) स्थापनेनंतर १० जूनच्या संध्याकाळी विभागांची विभागणी करण्यात आली. अर्थ मंत्रालय पुन्हा एकदा निर्मला सीतारामन यांच्या वाट्याला आले आहे. विभागाच्या विभाजनानंतर लगेचच, वित्तमंत्र्यांनी निर्णय घेतला की जून २०२४ साठी कर वितरणाच्या नियमित वितरीत रकमेव्यतिरिक्त, अतिरिक्त हप्ता जारी केला जाईल. जो १ लाख ३९ हजार ७५० कोटी रुपये आहे.


२०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी राज्यांना जारी केलेल्या या रकमेसह, १० जून २०२४ पर्यंत राज्यांना एकूण २ लाख ७९ हजार ५०० कोटी रुपयांचे कर वाटप करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश (२५०६९ कोटी) राज्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे ज्याला नवीन हप्त्यात सर्वाधिक कर वाटप झाले आहे. बिहार (१४०५६ कोटी) दुसऱ्या स्थानावर आणि मध्य प्रदेश (१०९७० कोटी) तिसऱ्या स्थानावर आहे. सर्वात कमी सिक्कीम (५४२ कोटी) आहे. महाराष्ट्राला ८८२८ कोटी रुपये मिळाले आहेत.



राज्यांच्या विकासावर कराचा हस्तांतरण खर्च केला जातो


वित्त आयोग देशातील सर्व राज्यांचा समान विकास सुनिश्चित करण्यासाठी निधीचे वितरण करतो. त्यासाठी एक सूत्र स्वीकारले जाते. यामध्ये वित्तीय क्षमता, वित्तीय शिस्त, राज्याची लोकसंख्या, राज्याचे क्षेत्रफळ विचारात घेतले जाते. त्यामुळे यूपी, एमपी, बिहार या राज्यांना जास्त पैसा मिळतो.

Comments
Add Comment

बिजू जनता दलाचे (बीजेडी) प्रमुख आणि ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक पुन्हा रुग्णालयात दाखल

मुंबई: बिजू जनता दलाचे (बीजेडी) प्रमुख आणि ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना वयोमानाशी संबंधित

उपराष्ट्रपतीपदासाठी NDA कडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे नाव जाहीर

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची आज नवी दिल्ली येथे महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत

Vice Presidential Election: उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएच्या उमेदवाराची आज होणार घोषणा

नवी दिल्ली: उपराष्ट्रपती पदासाठी आज एनडीएच्या उमेदवाराची दिल्लीत घोषणा होण्याची शक्यता आहे. संसदेचं पावसाळी

...नाही तर राहुल गांधींनी माफी मागावी !

नवी दिल्ली : मतचोरीचे आरोप करणाऱ्या पण हे आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे देणे टाळणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल

मुख्य निवडणूक आयुक्त संतापले, मतचोरीवर बेधडक बोलले

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन बेलगाम आरोप करणाऱ्या राहुल गांधी आणि त्यांच्या

भारताच्या स्टार खेळाडूच्या घरी चोरी, अनेक मानाचे पदक आणि पुरस्कारही पळवले

पश्चिम बंगाल: भारताची प्रसिद्ध जलतरणपटू आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्या बुला चौधरी यांच्या घरी चोरी झाली