Paytm Layoff : आर्थिक मंदीचा दणका! ‘या’ कंपनीकडून ३५०० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

Share

मुंबई : देशभरात वाढत्या महागाईचा सर्वसामान्यांना चांगलाच फटका बसत आहे. मात्र या महागाईचा मार सर्वसामान्य नागरिकांशिवाय इतर मोठ्या कंपन्यांनाही बसला आहे. जागतिक आर्थिक मंदीमुळे जगभरातील कंपन्यांनी संकटाची चाहूल लागताच आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यातच कॉर्पोरेट (Corporate) व आयटी (IT) क्षेत्रासह आता आणखी एका नावाजलेल्या कंपनीला आर्थिक मंदीचा दणका बसला आहे. त्यामुळे इतर क्षेत्रांप्रमाणेच ‘या’ मोठ्या कंपनीने देखील ३००० हून अधिक कर्मचाऱ्यांचा बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

‘या’ कंपनीला बसला आर्थिक दणका

वन९७ कम्युनिकेशन्स अर्थात ‘पेटीएम’चे (Paytm) स्वामित्व हक्क असणाऱ्या कंपनीकडून ३५०० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवल्याची माहिती मिळत आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. त्यासोबत या कंपनीने, काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांची आउटप्लेसमेंट अर्थात दुसऱ्या ठिकाणी नोकरीसाठीचा शोध घेण्यासंदर्भात काळजी घेत असल्याचा दावाही केला आहे.

दरम्यान, कामावरून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी नोकरी मिळवून देण्याच्या हेतूने सध्या कंपनीच्या HR विभागाकडून जवळपास ३० हून अधिक संस्थांशी संपर्क साधला जात आहे. त्यामुळे येत्या काळात नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना चांगल्या संस्थांमध्ये नोकरीवर रुजू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांची बोनसची रक्कम आणि तत्सम देय रक्कम बाकी आहे, अशा कर्मचाऱ्यांना पूर्ण परतावा देण्यावर आपला भर असल्याचे पेटीएमकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पेटीएमने स्पष्ट केले कारण

जानेवारी ते मार्च २०२४ या महिन्यांमध्ये पेटीएममधील कर्मचाऱ्यांची संख्या ३५०० ने कमी होऊन आता ३६,५२१ वर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) पेटीएम पेमेंट्स, बँकिंग सेवांवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे ही कर्मचारी कपात करण्यात आल्याचे म्हटले आहे. १५ मार्चपासूनच आरबीआयने कोणत्याही ग्राहक, वॉलेट, फास्टॅग मध्ये जमा रकमेचा स्वीकार करण्यावर बंदी आणली होती. त्यामुळे पेटीएमचे नुकसान चौथ्या तिमाहीत वाढून ५५० कोटींवर आले होते. येत्या काळात या अडचणी कमी होणार नसल्याचे चित्र दिसल्यामुळे कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे.

Recent Posts

रानडुकरांची शिकार आणि बिबट्यांची नसबंदी…

संतोष राऊळ मुंबई : वन्य प्राणी नागरी वस्तीत घुसणे, माणसांवर जीव घेणे हल्ले होणे.वन्य प्राण्यांपासून…

2 hours ago

Champions Trophy: भारत-पाकिस्तान सामना लाहोरमध्ये! १ मार्चला भिडणार रोहित-बाबरचे संघ

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर अद्याप मायदेशी परतलेले नाहीत. त्यातच त्यांचा २०२५मधील सगळ्यात…

2 hours ago

महाराष्ट्र लोक हक्क अधिनियम २०१५च्या कायद्याची १५ दिवसात होणार अंमलबजावणी

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी लागू करण्यात आलेले महाराष्ट्र लोक…

3 hours ago

तुम्ही Jio युजर्स आहात का? तर हे जरूर वाचा

मुंबई: रिलायन्स जिओने(reliance jio) आपल्या प्लानचे दर बदलले आहे. आजपासून नवे दर लागू झाले आहेत.…

3 hours ago

एलईडी मासेमारी पूर्णतः बंद करा; आमदार नितेश राणे विधानसभेत आक्रमक

मोठ्या रक्कमेचा दंड आणि शिक्षा होईल अशा पद्धतीचे कायदे अमलात आणा आमदार नितेश राणेंच्या मागणी…

4 hours ago

नार्वेकरांमुळेच काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा होणार पराभव

शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांनी वर्तविले भाकीत मुंबई : ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची विधानपरिषद निवडणुकीसाठी…

4 hours ago