Odisha CM: ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी मोहन चरण माझी यांच्या नावावर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: २४ वर्षांनी ओडिशामध्ये सत्ता बदल करणाऱ्या भाजपने राज्यात मोहन चरण माझी यांना नवे मुख्यमंत्री म्हणून निवडले आहे. यूपी-मध्य प्रदेश-छत्तीसगड प्रमाणेच ओडिशामध्ये भाजपने एक मुख्यमंत्री आणि दोन उप मुख्यमंत्री असा फॉर्म्युला लागू केला आहे.


ओडिशाचे दोन उप मुख्यमंत्री असणार आहेत. यात एका महिला उपमुख्यमंत्र्याचा समावेश आहे. पार्वती फरीदा आणि केवी सिंह देव राज्याचे उपमुख्यमंत्री असतील. मोहन माझी ओडिशाच्या राजकारणात पहिल्यांदा मोठ्या पदावर आहेत.



कोण आहेत मोहन माझी?


खरंतर, २०२४च्या ओडिशा विधानसभा निवडणुकीत भाजप नेता मोहन चरण माझी यांनी बिजू जनता दलाच्या मीना माझी यांना ११,५७७ मतांच्या अंतराने हरवत क्योझर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. ५२ वर्षीय मोहन चरण माझी हे चार वेळा आमदार आहेत. त्यांनी २००० ते २००९ पर्यंत दोन वेळा क्योझर येथे प्रतिनिधित्व केले आहे. यानंतर २०१९मध्ये भाजपच्या तिकीटावर क्योंझर येथून निवडणूक लढवली होती आणि विजय मिळवला होता.



कसा होता प्रवास?


मोहन चरण माझी यांचा जन्म ६ जानेवारी १९७२ला ओडिशाच्या क्योझरमध्ये झाला. ते अनुसूचित जमातीतून येतात. त्यांनी डॉ. प्रियंका मरांडी यांच्याशी लग्न केले आहे. त्यांनी आपल्या राजकीय करिअरची सुरूवात सरपंच म्हणून केली होती.


यानंतर २०००मध्ये त्यांनी पहिल्यांदा आमदारपदाची निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. भाजपने त्यांना राज्य आदिवासी मोर्चाचे सचिव बनवले.



ओडिशाचे १५वे मुख्यमंत्री असणार मोहन चरण मांझी


मोहन चरण माझी हे ओडिशाचे १५वे मुख्यमंत्री असतील. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकली होती तेव्हा नवीन पटनाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कमान सांभाळली होती.

Comments
Add Comment

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत