Odisha CM: ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी मोहन चरण माझी यांच्या नावावर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: २४ वर्षांनी ओडिशामध्ये सत्ता बदल करणाऱ्या भाजपने राज्यात मोहन चरण माझी यांना नवे मुख्यमंत्री म्हणून निवडले आहे. यूपी-मध्य प्रदेश-छत्तीसगड प्रमाणेच ओडिशामध्ये भाजपने एक मुख्यमंत्री आणि दोन उप मुख्यमंत्री असा फॉर्म्युला लागू केला आहे.


ओडिशाचे दोन उप मुख्यमंत्री असणार आहेत. यात एका महिला उपमुख्यमंत्र्याचा समावेश आहे. पार्वती फरीदा आणि केवी सिंह देव राज्याचे उपमुख्यमंत्री असतील. मोहन माझी ओडिशाच्या राजकारणात पहिल्यांदा मोठ्या पदावर आहेत.



कोण आहेत मोहन माझी?


खरंतर, २०२४च्या ओडिशा विधानसभा निवडणुकीत भाजप नेता मोहन चरण माझी यांनी बिजू जनता दलाच्या मीना माझी यांना ११,५७७ मतांच्या अंतराने हरवत क्योझर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. ५२ वर्षीय मोहन चरण माझी हे चार वेळा आमदार आहेत. त्यांनी २००० ते २००९ पर्यंत दोन वेळा क्योझर येथे प्रतिनिधित्व केले आहे. यानंतर २०१९मध्ये भाजपच्या तिकीटावर क्योंझर येथून निवडणूक लढवली होती आणि विजय मिळवला होता.



कसा होता प्रवास?


मोहन चरण माझी यांचा जन्म ६ जानेवारी १९७२ला ओडिशाच्या क्योझरमध्ये झाला. ते अनुसूचित जमातीतून येतात. त्यांनी डॉ. प्रियंका मरांडी यांच्याशी लग्न केले आहे. त्यांनी आपल्या राजकीय करिअरची सुरूवात सरपंच म्हणून केली होती.


यानंतर २०००मध्ये त्यांनी पहिल्यांदा आमदारपदाची निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. भाजपने त्यांना राज्य आदिवासी मोर्चाचे सचिव बनवले.



ओडिशाचे १५वे मुख्यमंत्री असणार मोहन चरण मांझी


मोहन चरण माझी हे ओडिशाचे १५वे मुख्यमंत्री असतील. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकली होती तेव्हा नवीन पटनाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कमान सांभाळली होती.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव