Mumbai Local : प्रवाशांचा खोळंबा! मध्य रेल्वेचा वेग पुन्हा मंदावला

प्रवाशांकडून प्रशासनावर तीव्र संताप


मुंबई : काही दिवसांपूर्वी रेल्वे फलाट विस्तारीकरणासाठी मेगाब्लॉक (Megablock) घेतला होता. त्यावेळी असंख्य रेल्वे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. मात्र तरीही मध्य रेल्वेची (Central Railway) परिस्थिती फारशी सुधरली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. तीन दिवसीय जम्बोब्लॉक नंतरही खोळंबा होत असल्यामुळे प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे मार्गावर सुधारणा करूनही कालपासून अनेक गाड्या उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला होता. दादर (Dadar) ते सीएसएमटी (CSMT) स्थानकादरम्यान रेल्वेचा वेग मंदावल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला होता. आजही परिस्थितीत फारशी सुधारणा नसल्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांनी जास्तीचा वेळ हातात घेऊन प्रवासासाठी निघावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


प्रवाशांकडून प्रशासनावर संताप


पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रेल्वे रुळांवर पाणी आल्यानंतरही मध्य रेल्वेवरील अनेक गाड्यांचा वेग मोठ्या फरकाने मंदावतो. त्यातच आता विलंबात यंत्रणेमुळे होणाऱ्या उशिराची भर पडताना दिसत आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्यांसह इतर प्रवाशांकडून प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री