PM Modi Oath Ceremony: मै नरेंद्र दामोदरदास मोदी... नरेंद्र मोदी बनले तिसऱ्यांदा पंतप्रधान

नवी दिल्ली: नरेंद्र मोदींनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा रंगत आहे.


यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये ७१ मंत्री शपथ घेत आहेत. मोदींच्या ३.० कॅबिनेटमध्ये ३० कॅबिनेट मंत्री, ५ राज्य मंत्री(स्वतंत्र प्रभार) आणि ३६ राज्य मंत्री शपथ घेत आहेत.


नरेंद्र मोदींच्या नंतर राजनाथ सिंह यांनी मोदी ३.०मध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. राजनाथ सिंह गेल्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री होते. लखनऊचे ते नवनिर्वाचित खासदार आहेत.


त्यानंतर भाजप नेते अमित शाह यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या सरकारमध्ये अमित शाह केंद्रीय गृहमंत्री होते. ते गुजरातचे चार वेळा खासदार आहेत.


अमित शाह यांच्यानंतर नितीन गडकरी यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. नितीन गडकरी गेल्या सरकारमध्येही मंत्री होते.

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेताच माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे.


लोकसभा २०२४च्या निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळालेले नाही मात्र एनडीए गठबंधनला २९३जागांवर यश मिळाले. हा आकडा बहुमतापेक्षा अधिक आहे.

Comments
Add Comment

Google's doodle : गुगलचं विशेष ‘पाय डे’ डूडल; गणितातील प्रसिद्ध स्थिरांकाला गुगलकडून अनोखा सलाम

मुंबई : गुगलने जगभरातील गणितप्रेमींसाठी १४ मार्च २०२६ रोजी खास डूडल सादर करून ‘पाय डे’ साजरा केला. या विशेष

Operation White Hammer : आंध्र प्रदेशात ४७ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

सिंथेटिक ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)

फास्टॅग वार्षिक पास १ एप्रिलपासून महाग होणार

नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना थोडा

युद्धामुळे महागणार विमान प्रवास?

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात

Dharmantar Bandi Kayda : सावधान! बळजबरीने किंवा आमिषाने धर्मांतर केल्यास...राज्य सरकारचा धर्मांतर बंदी कायद्याचा नवा प्रस्ताव सादर

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सक्तीच्या आणि फसव्या धर्मांतरांना लगाम घालण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

भारताच्या जहाजांना धोका नाही

इराणकडून मैत्रीचा हात पुढे नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला