PM Modi Oath Ceremony: मै नरेंद्र दामोदरदास मोदी... नरेंद्र मोदी बनले तिसऱ्यांदा पंतप्रधान

नवी दिल्ली: नरेंद्र मोदींनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा रंगत आहे.


यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये ७१ मंत्री शपथ घेत आहेत. मोदींच्या ३.० कॅबिनेटमध्ये ३० कॅबिनेट मंत्री, ५ राज्य मंत्री(स्वतंत्र प्रभार) आणि ३६ राज्य मंत्री शपथ घेत आहेत.


नरेंद्र मोदींच्या नंतर राजनाथ सिंह यांनी मोदी ३.०मध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. राजनाथ सिंह गेल्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री होते. लखनऊचे ते नवनिर्वाचित खासदार आहेत.


त्यानंतर भाजप नेते अमित शाह यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या सरकारमध्ये अमित शाह केंद्रीय गृहमंत्री होते. ते गुजरातचे चार वेळा खासदार आहेत.


अमित शाह यांच्यानंतर नितीन गडकरी यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. नितीन गडकरी गेल्या सरकारमध्येही मंत्री होते.

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेताच माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे.


लोकसभा २०२४च्या निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळालेले नाही मात्र एनडीए गठबंधनला २९३जागांवर यश मिळाले. हा आकडा बहुमतापेक्षा अधिक आहे.

Comments
Add Comment

वंदे मातरम् इतिहास नाही; देशाच्या अस्तित्वाची ओळख

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘वंदे मातरम् हे शब्द आपल्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करतात. आपल्याला हे शब्द बळ

शैक्षणिक संस्था, बसस्थानके, रेल्वे स्थानके आणि क्रीडा संकुलात भटक्या कुत्र्यांना ‘नो एण्ट्री’

सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश नवी दिल्ली : शैक्षणिक संस्था, बस-रेल्वे

तांत्रिक बिघाडामुळे दिल्लीचे 'एटीसी' कोलमडले! दिल्लीच्या एटीसी बिघाडाचा फटका मुंबईला!

नवी दिल्ली: दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि उत्तर भारतातील अनेक ठिकाणी एअर ट्रॅफिक

PM Modi : बिहारला नको 'कट्टा सरकार'! पंतप्रधान मोदींचा महाआघाडीवर 'दुतोंडी, गुंड' म्हणत जोरदार हल्लाबोल

औरंगाबाद : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी औरंगाबाद येथील एका

Delhi Airport : ATC सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड; दिल्ली विमानतळावर उड्डाणांना विलंब; प्रवाशांना मनस्ताप

नवी दिल्ली : देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) गुरुवारी

४१६ वर्षांत ४१६ वेळाच उघडले कार्तिकेयाचे मंदिर

ग्वालियर : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर, राज्यातील एकमेव भगवान कार्तिकेय स्वामी मंदिराचे दरवाजे अखेर मंगळवारी