PM Modi Oath Ceremony: मै नरेंद्र दामोदरदास मोदी... नरेंद्र मोदी बनले तिसऱ्यांदा पंतप्रधान

नवी दिल्ली: नरेंद्र मोदींनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा रंगत आहे.


यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये ७१ मंत्री शपथ घेत आहेत. मोदींच्या ३.० कॅबिनेटमध्ये ३० कॅबिनेट मंत्री, ५ राज्य मंत्री(स्वतंत्र प्रभार) आणि ३६ राज्य मंत्री शपथ घेत आहेत.


नरेंद्र मोदींच्या नंतर राजनाथ सिंह यांनी मोदी ३.०मध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. राजनाथ सिंह गेल्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री होते. लखनऊचे ते नवनिर्वाचित खासदार आहेत.


त्यानंतर भाजप नेते अमित शाह यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या सरकारमध्ये अमित शाह केंद्रीय गृहमंत्री होते. ते गुजरातचे चार वेळा खासदार आहेत.


अमित शाह यांच्यानंतर नितीन गडकरी यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. नितीन गडकरी गेल्या सरकारमध्येही मंत्री होते.

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेताच माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे.


लोकसभा २०२४च्या निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळालेले नाही मात्र एनडीए गठबंधनला २९३जागांवर यश मिळाले. हा आकडा बहुमतापेक्षा अधिक आहे.

Comments
Add Comment

स्वामी विवेकानंद यांची जयंती ; १० मुद्दे जे तुमचे भाषण गाजवतील

आज आपण 'युगपुरुष' स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती साजरी करणार आहोत. हा दिवस संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय युवा

महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार ?

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता

हल्दियात भारतीय नौदल नवा तळ उभारणार

बंगालच्या उपसागरात नौदलाची पकड वाढणार कोलकात्ता : पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे भारतीय नौदल नवीन नौदल तळ

कॅनडाचा इमिग्रेशन यूटर्न

नव्या नियमांचा भारतीय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी अडथळा नवी दिल्ली : कॅनडाने २०२६ साठी विद्यार्थी आणि

‘अल्मोंट-कीड’ बालसिरपमध्ये ‘इथिलीन ग्लायकॉल’

औषधांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह नवी दिल्ली : मुलांना दिल्या जाणाऱ्या औषधांच्या सुरक्षिततेवर

Indore Truck Accident : मुंबई-आग्रा हायवेवर गाड्यांचा चेंदामेंदा! तीव्र उतारावर ट्रकचे नियंत्रण सुटले अन् सात गाड्या एकमेकांवर...

महू : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मानपूर भेरू घाटात शनिवारी सकाळी सात वाहनांचा साखळी अपघात झाल्याची