पुण्यात SSC JE परीक्षेदरम्यान केंद्रावर मोठा गोंधळ!

  55

विद्यार्थ्यांवर परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ


पुणे : पुण्यात दिवसेंदिवस नवनवीन घटना घडत असल्याचे उघडकीस येत आहे. अशातच विद्येचे माहेरघर मानले जाणाऱ्या या पुण्यात परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची तारांबळ झाल्याची घटना घडली. SSC JEच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान गोंधळ झाल्याने अनेक विद्यार्थ्यांवर परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आली.


मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात हडपसरच्या सहयोग डिजिटल केंद्रावर हा प्रकार घडला आहे. SSC JEच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान कर्मचाऱ्यांनी वेळेआधीच गेट बंद करून घेतलं असल्याची माहिती मिळत आहे. ट्रॅफिक आणि कामावर जाणाऱ्या लोकांची गर्दी यामुळे विद्यार्थ्यांना केवळ १ ते २ मिनिटांचा उशीर झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी हुजेरगिरी करत गेट बंद केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विनवणी करुनही कर्मचाऱ्यांनी गेट उघडले नाही.


दरम्यान, कर्मचाऱ्यांनी वेळेआधीच परीक्षा केंद्रावरील गेट बंद केल्याने त्याचा विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी