Loksabha election 2024: राज ठाकरेंची सभा आणि उमेदवार विजयी

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे(loksabha election 2024) अपडेट हाती आले आहे. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत भाजपला मात्र मोठा धक्का बसला आहे. त्यांना स्पष्ट बहुमत दिसत नाही आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीने महायुतीला मागे टाकत आघाडी घेतली आहे.


महाराष्ट्रातील यंदाची निवडणूक रंगतदार ठरली होती. दोन्ही पक्षांमधील फुटीमुळे खरतर ही निवडणूक महत्त्वाची होती. त्यातच लोकसभेच्या प्रचारासाठी महायुतीसाठी राज ठाकरेंनी प्रचार केला होता. राज ठाकरेंचा हात खरंतर परिस स्पर्श ठरला आहे.


राज ठाकरेंनी महायुतीच्या ज्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या त्या सर्वच उमेदवारांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे. राज ठाकरे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ सभा घेतली होती. ते मुरलीधर मोहोळ त्यांच्या मतदारसंघातून विजयी झाले आहेत.


दुसरीकडे राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवली मतदारसंघाचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली होती. त्यानंतर डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही आपल्या मतदारसंघातून हॅटट्रिक मारली आहे. ते तिसऱ्यांदा या मतदारसंघातून निवडून आले आहेत.


तसेच राज ठाकरेंनी भाजपचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठीही कणकवलीत सभा घेतली होती. या मतदारसंघातही नारायण राणे यांनी विजय मिळवला आहे. नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार