Loksabha election 2024: राज ठाकरेंची सभा आणि उमेदवार विजयी

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे(loksabha election 2024) अपडेट हाती आले आहे. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत भाजपला मात्र मोठा धक्का बसला आहे. त्यांना स्पष्ट बहुमत दिसत नाही आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीने महायुतीला मागे टाकत आघाडी घेतली आहे.


महाराष्ट्रातील यंदाची निवडणूक रंगतदार ठरली होती. दोन्ही पक्षांमधील फुटीमुळे खरतर ही निवडणूक महत्त्वाची होती. त्यातच लोकसभेच्या प्रचारासाठी महायुतीसाठी राज ठाकरेंनी प्रचार केला होता. राज ठाकरेंचा हात खरंतर परिस स्पर्श ठरला आहे.


राज ठाकरेंनी महायुतीच्या ज्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या त्या सर्वच उमेदवारांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे. राज ठाकरे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ सभा घेतली होती. ते मुरलीधर मोहोळ त्यांच्या मतदारसंघातून विजयी झाले आहेत.


दुसरीकडे राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवली मतदारसंघाचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली होती. त्यानंतर डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही आपल्या मतदारसंघातून हॅटट्रिक मारली आहे. ते तिसऱ्यांदा या मतदारसंघातून निवडून आले आहेत.


तसेच राज ठाकरेंनी भाजपचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठीही कणकवलीत सभा घेतली होती. या मतदारसंघातही नारायण राणे यांनी विजय मिळवला आहे. नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी