मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४ची मतमोजणी अखेरच्या टप्प्यात आली आहे. मतमोजणीच्या आकड्याने मात्र साऱ्याच पक्षांना हैराण केले आहे. यातच भाजपचे उमेदरवा सुरेश गोपी यांनी केरळच्या त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे. यासोबतच इतिहासात पहिल्यांदा भाजपने केरळमध्ये आपले खाते खोलले आहे. या निवडणुकीत सुरेश गोपी यांनी आपले प्रतिस्पर्धी सीपीआयचे के व्ही एस सुनील कुमार यांना ७४,६८९ मतांनी हरवले.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुरेश गोपी ४ लाख १२ हजार ३३८ मते मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी सीपीआयचे उमेदवार के व्ही एस सुनील कुमार यांना ३ लाख ३७ हजार ६५२ मते मिळाली आहेत. तर तिसऱ्या स्थानावर काँग्रेसचे के मुरलीधरन होते. त्यांना ३,२८,१२४ मते मिळाली.
त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचा हा विजय महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीआधी सुरेश गोपी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत त्यानंतर २०२१च्या राज्य विधानसभा निवडणुकीत हरले होते.
पुणे : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत कोकणात, मध्य महाराष्ट्र,…
पंकजा मुंडेंची लागली वर्णी; आणखी कोणाकोणाला मिळाली संधी? मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election) राज्यात…
झोपेत चालत थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला मुंबई : झोपेत चालण्याच्या सवयीमुळे (sleepwalking) भायखळा येथील…
जाळपोळ आणि तोडफोड करत केले आंदोलन नागपूर : जगभरातील बौद्ध अनुयायांसह (Buddhist followers) तमाम भारतीयांचे…
ताह्मिणी घाटातील धक्कादायक प्रकार पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात.…
AI च्या किमयेने कट रचला आणि मैत्रिणीने चुना लावला मुंबई : हल्ली एआय तंत्रज्ञानामुळे (AI…