Lok Sabha Election 2024: केरळमध्ये पहिल्यांदा कमळ फुलले , BJPने रचला इतिहास

Share

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४ची मतमोजणी अखेरच्या टप्प्यात आली आहे. मतमोजणीच्या आकड्याने मात्र साऱ्याच पक्षांना हैराण केले आहे. यातच भाजपचे उमेदरवा सुरेश गोपी यांनी केरळच्या त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे. यासोबतच इतिहासात पहिल्यांदा भाजपने केरळमध्ये आपले खाते खोलले आहे. या निवडणुकीत सुरेश गोपी यांनी आपले प्रतिस्पर्धी सीपीआयचे के व्ही एस सुनील कुमार यांना ७४,६८९ मतांनी हरवले.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुरेश गोपी ४ लाख १२ हजार ३३८ मते मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी सीपीआयचे उमेदवार के व्ही एस सुनील कुमार यांना ३ लाख ३७ हजार ६५२ मते मिळाली आहेत. तर तिसऱ्या स्थानावर काँग्रेसचे के मुरलीधरन होते. त्यांना ३,२८,१२४ मते मिळाली.

२०२१मध्ये विधानसभा निवडणुकीत झाला होता सुरेश गोपी यांचा पराभव

त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचा हा विजय महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीआधी सुरेश गोपी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत त्यानंतर २०२१च्या राज्य विधानसभा निवडणुकीत हरले होते.

Recent Posts

Delta Plane Catches Fire : ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, २८२ प्रवासी थोडक्यात बचावले

ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…

29 minutes ago

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

1 hour ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

2 hours ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

2 hours ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

3 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

3 hours ago