मुंबई : मध्य रेल्वेने (Central Railway) काही दिवसांपूर्वी ठाणे (Thane) आणि सीएसएमटी (CSMT) स्थानकावर फलाट रुंदीकरणासाठी ६३ तासांचा मेगाब्लॉक (Megablock) घेतला होता. त्यादरम्यान ९०० हून अधिक रेल्वे गाड्या देखील रद्द करण्यात आल्या होत्या. परंतु याकाळात प्रवाशांचा खोळंबा आणि गैरसोय होऊ नये यासाठी बेस्टने (BEST) अतिरिक्त बस चालवण्याचा निर्णय घेतला होता. अतिरिक्त बससेवेमुळे प्रवाशांनाही दिलासा मिळाला असून मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे बेस्टला चांगलाच फायदा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दररोज बेस्टने प्रवास करणाऱ्यांची संख्या ३२ ते ३३ लाख असते. मात्र मध्य रेल्वेच्या ब्लॉक काळात बेस्टने प्रवाशांच्या सोयीसाठी तीन दिवस ५५ अतिरिक्त बस चालवण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये जादा ५५ बसच्या ४८६ फेऱ्या चालवण्यात आल्या. त्यासोबत यामध्ये वातानुकूलित दुमजली बसचाही समावेश होता. ब्लॉक कालावधील प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात बस सेवेचा वापर केल्याने बेस्टच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती मिळत आहे.
मध्य रेल्वेवरील जम्बो ब्लॉकच्या कालावधीत १ जून रोजी बेस्ट बसमधून २७ लाख ३७ हजार ९७६, तर २ जून रोजी १९ लाख ६० हजार ५१२ मुंबईकरांनी प्रवासा केला होता. या दोन दिवसांत बेस्टला तीन कोटी ४७ लाखांचे उत्पन्न मिळाले असून ते नेहमीच्या उत्पन्नापेक्षा १० टक्क्यांनी अधिक असल्याची माहिती बेस्टकडून मिळाली आहे.
बार्बाडोस : आदरणीय नरेंद्र मोदी सर, तुमचे शब्द आणि पाठिंबा यासाठी तुमचे खूप खूप आभार.…
जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत, वेतन व शैक्षणिक पात्रता मुंबई : तरुणांसाठी भरघोस पगारासह सरकारी…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला मुंबई : 'विधीमंडळ लोकशाहीचा प्रमुख स्तंभ आहे. या सभागृहाचा…
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हाथरसमध्ये धार्मिक सत्संगादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. भोले…
उत्सुकता वाढवणारा टीझर रिलीज; 'या' तारखेला प्रदर्शित होणार चित्रपट मुंबई : सध्याच्या काळात इंटरनेटचा (Internet)…
आमदार नितेश राणे यांचा राहुल गांधींना कडक इशारा शिवसेनेच्या जडणघडणीतला खरा व्हिलन उद्धव ठाकरे :…