BEST : रेल्वे ब्लॉकचा बेस्टला फायदा! उत्पन्नात तब्बल 'इतक्या' कोटींची वाढ

मुंबई : मध्य रेल्वेने (Central Railway) काही दिवसांपूर्वी ठाणे (Thane) आणि सीएसएमटी (CSMT) स्थानकावर फलाट रुंदीकरणासाठी ६३ तासांचा मेगाब्लॉक (Megablock) घेतला होता. त्यादरम्यान ९०० हून अधिक रेल्वे गाड्या देखील रद्द करण्यात आल्या होत्या. परंतु याकाळात प्रवाशांचा खोळंबा आणि गैरसोय होऊ नये यासाठी बेस्टने (BEST) अतिरिक्त बस चालवण्याचा निर्णय घेतला होता. अतिरिक्त बससेवेमुळे प्रवाशांनाही दिलासा मिळाला असून मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे बेस्टला चांगलाच फायदा झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दररोज बेस्टने प्रवास करणाऱ्यांची संख्या ३२ ते ३३ लाख असते. मात्र मध्य रेल्वेच्या ब्लॉक काळात बेस्टने प्रवाशांच्या सोयीसाठी तीन दिवस ५५ अतिरिक्त बस चालवण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये जादा ५५ बसच्या ४८६ फेऱ्या चालवण्यात आल्या. त्यासोबत यामध्ये वातानुकूलित दुमजली बसचाही समावेश होता. ब्लॉक कालावधील प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात बस सेवेचा वापर केल्याने बेस्टच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती मिळत आहे.



नेहमीपेक्षा उत्पन्नात १० टक्क्यांनी वाढ


मध्य रेल्वेवरील जम्बो ब्लॉकच्या कालावधीत १ जून रोजी बेस्ट बसमधून २७ लाख ३७ हजार ९७६, तर २ जून रोजी १९ लाख ६० हजार ५१२ मुंबईकरांनी प्रवासा केला होता. या दोन दिवसांत बेस्टला तीन कोटी ४७ लाखांचे उत्पन्न मिळाले असून ते नेहमीच्या उत्पन्नापेक्षा १० टक्क्यांनी अधिक असल्याची माहिती बेस्टकडून मिळाली आहे.

Comments
Add Comment

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा