BEST : रेल्वे ब्लॉकचा बेस्टला फायदा! उत्पन्नात तब्बल 'इतक्या' कोटींची वाढ

  49

मुंबई : मध्य रेल्वेने (Central Railway) काही दिवसांपूर्वी ठाणे (Thane) आणि सीएसएमटी (CSMT) स्थानकावर फलाट रुंदीकरणासाठी ६३ तासांचा मेगाब्लॉक (Megablock) घेतला होता. त्यादरम्यान ९०० हून अधिक रेल्वे गाड्या देखील रद्द करण्यात आल्या होत्या. परंतु याकाळात प्रवाशांचा खोळंबा आणि गैरसोय होऊ नये यासाठी बेस्टने (BEST) अतिरिक्त बस चालवण्याचा निर्णय घेतला होता. अतिरिक्त बससेवेमुळे प्रवाशांनाही दिलासा मिळाला असून मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे बेस्टला चांगलाच फायदा झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दररोज बेस्टने प्रवास करणाऱ्यांची संख्या ३२ ते ३३ लाख असते. मात्र मध्य रेल्वेच्या ब्लॉक काळात बेस्टने प्रवाशांच्या सोयीसाठी तीन दिवस ५५ अतिरिक्त बस चालवण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये जादा ५५ बसच्या ४८६ फेऱ्या चालवण्यात आल्या. त्यासोबत यामध्ये वातानुकूलित दुमजली बसचाही समावेश होता. ब्लॉक कालावधील प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात बस सेवेचा वापर केल्याने बेस्टच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती मिळत आहे.



नेहमीपेक्षा उत्पन्नात १० टक्क्यांनी वाढ


मध्य रेल्वेवरील जम्बो ब्लॉकच्या कालावधीत १ जून रोजी बेस्ट बसमधून २७ लाख ३७ हजार ९७६, तर २ जून रोजी १९ लाख ६० हजार ५१२ मुंबईकरांनी प्रवासा केला होता. या दोन दिवसांत बेस्टला तीन कोटी ४७ लाखांचे उत्पन्न मिळाले असून ते नेहमीच्या उत्पन्नापेक्षा १० टक्क्यांनी अधिक असल्याची माहिती बेस्टकडून मिळाली आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.