Taj Express: दिल्लीत ताज एक्सप्रेस ट्रेनच्या डब्यांमध्ये लागली आग, सर्व प्रवासी सुरक्षित

नवी दिल्ली: दिल्लीच्या सरिता विहार पोलीस स्टेशनजवळ सोमवारी ताज एक्सप्रेसच्या ३ डब्यांना आग लागली. १२२८० ताज एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीमुळे कोणतेही नुकसान झाले नाही. उत्तर रेल्वेच्या माहितीनुसार तुगलकाबाद-ओखला यांच्यात ताज एक्सप्रेसच्या दोन डब्यांना आग लागली. दरम्यान, सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.


डीसीपी रेल्वेच्या माहितीनुसार, अग्निशमन दलाचे एकूण ६ बंब घटनास्थळी पाठवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार कोणत्याही व्यक्तीला जखम अथवा नुकसान झालेले नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना मेहनत करावी लागली.



ताज एक्सप्रेसच्या डब्यांना लागली आग


दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जूनला ट्रेनला आग लागण्यासंदर्भात संध्याकाळी ४.४१ वाजण्याच्या सुमारास पीसीआरला कॉल मिळाला. यावेळी ताज एक्सप्रेसच्या तीन डब्यांना आग लागली होती. दरम्यान, हे वृत्त समजताच ट्रेन थांबवण्यात आली. यात कोणीही जखमी झालेले नाही. कारण प्रवासी दुसऱ्या डब्यात गेले आणि उतरले. रेल्वेकडून पुढील कारवाई केली जात आहे.



घटनास्थळी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या दाखल


भीषण उन्हाळ्यादरम्यान दिल्लीच्या सरिता विहार ट्रेनमध्ये आग लागल्याची सूचना मिळाली. घटनास्थळी तातडीने फायर ब्रिगेडच्या गाड्या रवाना करण्यात आल्या.
Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे