Taj Express: दिल्लीत ताज एक्सप्रेस ट्रेनच्या डब्यांमध्ये लागली आग, सर्व प्रवासी सुरक्षित

नवी दिल्ली: दिल्लीच्या सरिता विहार पोलीस स्टेशनजवळ सोमवारी ताज एक्सप्रेसच्या ३ डब्यांना आग लागली. १२२८० ताज एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीमुळे कोणतेही नुकसान झाले नाही. उत्तर रेल्वेच्या माहितीनुसार तुगलकाबाद-ओखला यांच्यात ताज एक्सप्रेसच्या दोन डब्यांना आग लागली. दरम्यान, सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.


डीसीपी रेल्वेच्या माहितीनुसार, अग्निशमन दलाचे एकूण ६ बंब घटनास्थळी पाठवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार कोणत्याही व्यक्तीला जखम अथवा नुकसान झालेले नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना मेहनत करावी लागली.



ताज एक्सप्रेसच्या डब्यांना लागली आग


दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जूनला ट्रेनला आग लागण्यासंदर्भात संध्याकाळी ४.४१ वाजण्याच्या सुमारास पीसीआरला कॉल मिळाला. यावेळी ताज एक्सप्रेसच्या तीन डब्यांना आग लागली होती. दरम्यान, हे वृत्त समजताच ट्रेन थांबवण्यात आली. यात कोणीही जखमी झालेले नाही. कारण प्रवासी दुसऱ्या डब्यात गेले आणि उतरले. रेल्वेकडून पुढील कारवाई केली जात आहे.



घटनास्थळी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या दाखल


भीषण उन्हाळ्यादरम्यान दिल्लीच्या सरिता विहार ट्रेनमध्ये आग लागल्याची सूचना मिळाली. घटनास्थळी तातडीने फायर ब्रिगेडच्या गाड्या रवाना करण्यात आल्या.
Comments
Add Comment

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा