Taj Express: दिल्लीत ताज एक्सप्रेस ट्रेनच्या डब्यांमध्ये लागली आग, सर्व प्रवासी सुरक्षित

नवी दिल्ली: दिल्लीच्या सरिता विहार पोलीस स्टेशनजवळ सोमवारी ताज एक्सप्रेसच्या ३ डब्यांना आग लागली. १२२८० ताज एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीमुळे कोणतेही नुकसान झाले नाही. उत्तर रेल्वेच्या माहितीनुसार तुगलकाबाद-ओखला यांच्यात ताज एक्सप्रेसच्या दोन डब्यांना आग लागली. दरम्यान, सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.


डीसीपी रेल्वेच्या माहितीनुसार, अग्निशमन दलाचे एकूण ६ बंब घटनास्थळी पाठवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार कोणत्याही व्यक्तीला जखम अथवा नुकसान झालेले नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना मेहनत करावी लागली.



ताज एक्सप्रेसच्या डब्यांना लागली आग


दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जूनला ट्रेनला आग लागण्यासंदर्भात संध्याकाळी ४.४१ वाजण्याच्या सुमारास पीसीआरला कॉल मिळाला. यावेळी ताज एक्सप्रेसच्या तीन डब्यांना आग लागली होती. दरम्यान, हे वृत्त समजताच ट्रेन थांबवण्यात आली. यात कोणीही जखमी झालेले नाही. कारण प्रवासी दुसऱ्या डब्यात गेले आणि उतरले. रेल्वेकडून पुढील कारवाई केली जात आहे.



घटनास्थळी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या दाखल


भीषण उन्हाळ्यादरम्यान दिल्लीच्या सरिता विहार ट्रेनमध्ये आग लागल्याची सूचना मिळाली. घटनास्थळी तातडीने फायर ब्रिगेडच्या गाड्या रवाना करण्यात आल्या.
Comments
Add Comment

फॉलोअर्सच्या शर्यतीत मुलांचं बालपण धोक्यात, सुधा मूर्तींची सरकारकडे महत्त्वाची मागणी

नवी दिल्ली : इंटरनेटवर आज असंख्य रील्स आणि व्हिडिओ पाहायला मिळतात ज्यात लहान मुलांचा थेट कंटेंट म्हणून वापर केला

उड्डाणं रद्द, तिकीटदर वाढले; हवाई प्रवासातील गोंधळावर सरकारची मोठी कारवाई

नवी दिल्ली : इंडिगोच्या तांत्रिक आणि व्यवस्थापकीय अडचणींमुळे मागील काही दिवसांपासून देशात मोठे विमान प्रवास

प्रवाशांना विमान रद्दीकरणाची पूर्ण परतफेड मिळणार! इंडिगोचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमान कंपनीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चेक-इन प्रणालीत

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३