Taj Express: दिल्लीत ताज एक्सप्रेस ट्रेनच्या डब्यांमध्ये लागली आग, सर्व प्रवासी सुरक्षित

नवी दिल्ली: दिल्लीच्या सरिता विहार पोलीस स्टेशनजवळ सोमवारी ताज एक्सप्रेसच्या ३ डब्यांना आग लागली. १२२८० ताज एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीमुळे कोणतेही नुकसान झाले नाही. उत्तर रेल्वेच्या माहितीनुसार तुगलकाबाद-ओखला यांच्यात ताज एक्सप्रेसच्या दोन डब्यांना आग लागली. दरम्यान, सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.


डीसीपी रेल्वेच्या माहितीनुसार, अग्निशमन दलाचे एकूण ६ बंब घटनास्थळी पाठवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार कोणत्याही व्यक्तीला जखम अथवा नुकसान झालेले नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना मेहनत करावी लागली.



ताज एक्सप्रेसच्या डब्यांना लागली आग


दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जूनला ट्रेनला आग लागण्यासंदर्भात संध्याकाळी ४.४१ वाजण्याच्या सुमारास पीसीआरला कॉल मिळाला. यावेळी ताज एक्सप्रेसच्या तीन डब्यांना आग लागली होती. दरम्यान, हे वृत्त समजताच ट्रेन थांबवण्यात आली. यात कोणीही जखमी झालेले नाही. कारण प्रवासी दुसऱ्या डब्यात गेले आणि उतरले. रेल्वेकडून पुढील कारवाई केली जात आहे.



घटनास्थळी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या दाखल


भीषण उन्हाळ्यादरम्यान दिल्लीच्या सरिता विहार ट्रेनमध्ये आग लागल्याची सूचना मिळाली. घटनास्थळी तातडीने फायर ब्रिगेडच्या गाड्या रवाना करण्यात आल्या.
Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी