भाजपाकडून विजयापूर्वीच जल्लोषाची तयारी

Share

पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून भाजपा कार्यालयापर्यत होणार रोड शो

नवी दिल्ली : एक्झिट पोलमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा आणि एनडीएला ३५० ते ४०० च्या आसपास मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीमध्येही मोठे यश मिळण्याची अपेक्षा भाजपाला असून, भाजपाकडून विजयानंतरच्या जल्लोषासाठी तयारीही सुरू करण्यात आली आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने ‘अबकी बार ४०० पार’ असा नारा देत आपल्या प्रचार अभियानाची सुरुवात केली होती. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीचे बिगुल वाजल्यावर भाजपा आणि विरोधातील इंडिया आघाडीमध्ये अटीतटीचा सामना आहे, असे चित्र दिसत होते. पण सातव्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा आणि एनडीएला ३५० ते ४०० च्या आसपास मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीमध्येही मोठे यश मिळण्याची अपेक्षा भाजपाला असून, भाजपाकडून विजयानंतरच्या जल्लोषासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भव्य रोड शोचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये भाजपाचे लाखो कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता असून, हा रोड शो पंतप्रधानाच्या निवासस्थानापासून भाजपाच्या कार्यालयापर्यंत जाईल.

भारत मंडपम, यशोभूमि, कर्तव्य पथ या ठिकाणांची चाचपणी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीचे निकाल भाजपाच्या बाजूने आल्यानंतर मोठ्या विजयोत्सवाचे आयोजन केले जाईल. तसेच विजयोत्सवासाठी भारत मंडपम, यशोभूमि आणि कर्तव्य पथ या ठिकाणांवरून भाजपा चाचपणी करत आहे. मोदी सरकारचा शपथविधी झाल्यानंतर हा मोठा विजयोत्सव साजरा केला जाईल. मात्र हा कार्यक्रम कुठे होईल, याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.

नव्या सरकारचा शपथविधी ९ जून रोजी होण्याची शक्यता

दरम्यान, सूत्रांनी सांगितले की, विजयोत्सवाचा कार्यक्रम हा शपथविधीनंतर भारत मंडपम किंवा कर्तव्य पथावर आयोजित होण्याची शक्यता आहे. ‘भारताचा सांस्कृतिक ठेवा’ या थीमवर हा कार्यक्रम आयोजित होणार आहे. तसेच यामध्ये लाईट अँड साऊंड शोसुद्धा होणार आहे. तसेच या कार्यक्रमामध्ये अनेक परदेशी सरकारांचे प्रतिनिधी सहभागी होतील. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर नव्या सरकारचा शपथविधी हा ९ जून रोजी होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. मागच्या वेळी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ३० मे रोजी सरकारने शपथ घेतली होती.

Recent Posts

Lalit Machanda Suicide: ‘तारक मेहता….’ फेम अभिनेते ललित मनचंदा यांनी ‘या’ कारणांमुळे केली आत्महत्या

मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…

40 seconds ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, एक ठार तर अनेकजण गंभीर जखमी

पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…

1 hour ago

मत्स्यव्यवसायाला आजपासून कृषीचा दर्जा; राज्यातील ४ लाख ८३ हजार मच्छीमारांना होणार फायदा

ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…

1 hour ago

फडणवीस सांगतील तसं चालणार! थोपटेंनंतर तांबेही भाजपाच्या दिशेने?

पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…

2 hours ago

Sangram Thopte : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! काँग्रेसच्या माजी आमदारांनी हाती घेतले ‘कमळ’

पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…

2 hours ago

Tiger Shroff: टायगर श्रॉफला जीवे मारण्याची धमकी! खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीला पंजाबमधून अटक

मुंबई: टायगर श्रॉफला (Tiger Shroff) जीवे मारण्याच्या धमकी संदर्भात केलेल्या खोट्या तक्रारीबद्दल, मुंबई पोलिसांनी पंजाबमधील…

2 hours ago