Nitesh Rane : भाजपासोबत येण्यासाठी उद्धव ठाकरे व संजय राऊतची लंडनमध्ये झाली बैठक!

भाजपा प्रवक्ते नितेश राणे यांचा दावा


पराभव निश्चित झाल्यामुळे विरोधकांची शेंबड्या मुलासारखी रडारड; नितेश राणेंचा टोला


मुंबई : 'अपेक्षेप्रमाणे विरोधकांची आणि इंडी ब्लॉकच्या नेतेमंडळींची रडारड सुरु झाली आहे. संजय राजाराम राऊतला निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा एक्स्टेंडेड हात असल्याचं २०२४लाच आठवतं. २०१४ आणि २०१९ ला जेव्हा उद्धव ठाकरे हे एनडीएमध्ये होते, तेव्हा त्याला कुठेच असं वाटलं नाही. पण आता पराभव निश्चित झाला आहे, त्यामुळे शेंबड्या मुलासारखी रडारड सुरु झाली आहे', असा जोरदार टोला भाजपा प्रवक्ते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी लगावला. त्याचबरोबर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) एनडीएमध्ये (NDA) येण्यासाठी तडफडत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.


नितेश राणे म्हणाले, आदरणीय पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) साहेब हे केवळ २०२४ मध्येच ध्यान करण्यासाठी बसले नव्हते. २०१९ मध्ये देखील केदारनाथला जाऊन त्यांनी ध्यान केलं होतं. मग तेव्हा उद्धव ठाकरे आणि संजय राऊतने त्यावर आक्षेप का घेतला नाही? त्यांना तो आचारसंहितेचा भंग तेव्हा का वाटला नाही? कारण तेव्हा मोदीसाहेबांच्या आशिर्वादामुळेच त्यांचे १८ खासदार निवडून येत होते. पण आता जेव्हा खासदार निवडून आणण्याचे वांदे झाले आहेत, तेव्हा मोदीसाहेबांच्या प्रत्येक गोष्टीवर टीका सुरु झाल्या आहेत, असं नितेश राणे म्हणाले.


पुढे ते म्हणाले, संजय राऊतला माझा प्रश्न आहे की, तुम्ही इंडिया आघाडीसोबत तरी प्रामाणिक आहात का? तुम्ही कुठल्या तोंडाने मोदीसाहेब आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांवर टीका करत आहात? तुम्ही जास्तच अगर टीका करत असाल तर मग लंडनमध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊतची एनडीएमध्ये येण्याच्या दृष्टिकोनातून कुठली व कोणाबरोबर बैठक झाली? कुठल्या अटीशर्थींवर चर्चा झाली? कुठे झाली? त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला जाहीर करावे लागतील, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.


एका बाजूला एनडीएमध्ये येण्यासाठी तडफडायचं, हातपाय जोडायचे, आम्हाला उद्या कसंही एनडीएमध्ये घ्या, आम्हाला काँग्रेस आणि इंडी ब्लॉकच्या लोकांसोबत राहायचं नाही, असं त्या बैठकीमध्ये सांगायचं आणि इथे येऊन नाक रगडायचं आणि मोदीजींवर टीका करायची. सांगलीच्या जागेचं निमित्त घेऊन उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या बाहेर पडणार, हे तुम्ही आताच लिहून ठेवा. जर निवडणुकीच्या काही दिवसांनंतर असं नाही घडलं, तर तुम्ही मला प्रश्न विचारायला या, असं थेट आव्हान नितेश राणे यांनी दिलं.



मुंबई पदवीधरच्या उमेदवारीवरुन मातोश्रीमध्ये महाभारत


अनिल परबने मातोश्रीला ब्लॅकमेल करुन ही उमेदवारी मिळवलेली आहे. अनिल परबला उमेदवारी जाहीर झाल्याच्या दिवसापासून वरुण सरदेसाईने मातोश्रीमध्ये पाऊल देखील ठेवलेलं नाही, असा आरोप नितेश राणे यांनी केला. कारण आम्ही आतापर्यंत ऐकत होतो की वरुण सरदेसाई हे मुंबई पदवीधरचे उमेदवार असणार त्याप्रमाणे मातोश्रीच्या तिसर्‍या माळ्यावर राहणार्‍या वहिनींनी जोर लावला. पण अनिल परबने ब्लॅकमेल करुन ही उमेदवारी मिळवली. त्यामुळे मातोश्रीमध्ये उमेदवारीवरुन काय महाभारत सुरु आहे, हे येत्या काही दिवसांत कळेल, असं नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

Maharashtra Delivery Boy Police Verification : यापुढे ‘डिलिव्हरी बॉईज’ची तपासणी बंधनकारक; राज्य सरकारचा मोठा निर्णय

कामगार मंत्र्यांचे गृह विभागाला सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे निर्देश मुंबई : ऑनलाईन प्लॅटफॉर्म, गिग आणि

Gautam Birhade : गौतम बिर्‍हाडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे नवे संचालक

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) संचालक (प्रकल्प) पदी ज्येष्ठ अभियंता गौतम बिर्‍हाडे (Gautam Birhade)

चित्र साकारताना कल्पनाशक्तीची ज्योत सतत तेवत ठेवा; शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांचा संदेश

मुंबई: चित्रकला म्हणजे मनातील विचारांना कागदावर उतरविण्याचे साधन असते. यात निसर्गातील विविध रंगांसह आपल्या

मुंबई महापालिका रुग्णालयांमधील मिळणार खाटांची माहिती; डॅशबोर्डची सेवा उपलब्ध करून देणार

मुंबई: नागरिकांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध रुग्णशया व अतिदक्षता विभागातील रुग्णाशय्या इत्यादी

घाटकोपरवासियांचा १० एप्रिल २०२६ पासून पाणीपुरवठा पूर्ववत; पुढील काही दिवस उकळून प्यावे लागणार पाणी

मुंबई: घाटकोपर (पश्चिम) येथील घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयातील दोन कप्प्याच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेच्या

MLA Amit Satam सीसी रस्त्यांमुळे खड्डे दुरुस्तीवरील खर्चात जवळपास ७० टक्क्याहून अधिक घट — भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

आमदार अमीत साटम यांनी घेतला सीसी रस्त्यांच्या कामांचा आढावा मुंबई : भाजप-नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून