PM Modi: एक्झिट पोलनंतर पंतप्रधान मोदी कार्यरत, आज बोलावल्या ७ बैठका

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी ७ बैठका बोलावल्या आहेत. या बैठकांदरम्यान देशातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकींसाठीचे मतदान संपल्यानंतर पंतप्रधानांकडून या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.


निवडणुकीचा निकाल ४ जूनला येणार आहे. मात्र त्याआधीच आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला प्रचंड बहुमत मिळाल्याचे दिसत आहे. येथे निवडणुकीच्य निकालाआधीच पंतप्रधान मोदी कामाला लागले आहेत.



देशातील उष्णतेच्या लाटेबाबत होणार बैठक


सूत्रांच्या माहितीनुसार मोदींच्या अध्यक्षतेखालील ज्या ७ बैठका होणार आहेत त्यातील एका बैठकीत देशातील उष्णतेच्या लाटेवर चर्चा केली जाऊ शकते. केंद्र स्तरावर या उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी काय प्लान बनवण्यात आला आहे. याची माहिती घेतली जाईल. देशभरात उष्णतेचा कहर सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये उष्णतेचे बळी गेले आहेत.


लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान १ जूनला पार पडले. मतदानाचे सर्व टप्पे पार पडल्यानंतर अनेक वृत्तवाहिन्या तसेच संस्थांनी एक्झिट पोल दाखवले. या एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळणार असल्याचे दिसत आहे. त्यांना ४०० पार यावेळेस जागा मिळणार नसल्या तरीही तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्ते येऊ शकते.


एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रासाठी धक्कादायक अंदाज आहे. एनडीएला राज्यात मोठा धक्का बसू शकतो. राज्यात महायुतीला २२ जागा तसेच महाविकास आघाडीला २५ जागा मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

India T20 World Cup Squad Announcement : वर्ल्ड कप २०२६ साठी टीम इंडिया सज्ज! BCCIची आज महत्त्वाची बैठक; कोणाला मिळणार संधी अन् कोणाचा पत्ता कट?

मुंबई : आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी संपूर्ण क्रिकेट विश्व ज्याची वाट पाहत आहे, त्या भारतीय संघाची घोषणा

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १७ वर्षांची जेल; भ्रष्टाचार प्रकरणात पत्नी बुशरा बीबीलाही मोठी शिक्षा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना भ्रष्टाचाराच्या एका मोठ्या

Rajdhani Express Accident : आसाममध्ये काळजाचा थरकाप! राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक, ८ हत्तीचं जागीच दुर्दैवी मृत्यू

आसाममधील जमुनामुख जवळील सानरोजा भागात शुक्रवारी मध्यरात्री एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी रेल्वे अपघात झाला.

केदारनाथमधून बर्फ गायब; निसर्गाचा इशारा की हवामान बदलाचा परिणाम?

उत्तराखंड : ऋतुचक्र बदलत चाललंय या आधी आपण फक्त बोलतच होतो पण आता ते प्रत्यक्षात घडत जात आहे. कारण केदारनाथ

भारत-ओमानची मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी

करारामुळे द्विपक्षीय संबंधांना नवी ऊर्जा मस्कत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशी

IND vs SA : संजूचा नादच खुळा! १००० धावांचा टप्पा पार करत अभिषेक-सूर्याच्या पंगतीत पटकावले स्थान

भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात आपल्या