PM Modi: एक्झिट पोलनंतर पंतप्रधान मोदी कार्यरत, आज बोलावल्या ७ बैठका

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी ७ बैठका बोलावल्या आहेत. या बैठकांदरम्यान देशातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकींसाठीचे मतदान संपल्यानंतर पंतप्रधानांकडून या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.


निवडणुकीचा निकाल ४ जूनला येणार आहे. मात्र त्याआधीच आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला प्रचंड बहुमत मिळाल्याचे दिसत आहे. येथे निवडणुकीच्य निकालाआधीच पंतप्रधान मोदी कामाला लागले आहेत.



देशातील उष्णतेच्या लाटेबाबत होणार बैठक


सूत्रांच्या माहितीनुसार मोदींच्या अध्यक्षतेखालील ज्या ७ बैठका होणार आहेत त्यातील एका बैठकीत देशातील उष्णतेच्या लाटेवर चर्चा केली जाऊ शकते. केंद्र स्तरावर या उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी काय प्लान बनवण्यात आला आहे. याची माहिती घेतली जाईल. देशभरात उष्णतेचा कहर सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये उष्णतेचे बळी गेले आहेत.


लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान १ जूनला पार पडले. मतदानाचे सर्व टप्पे पार पडल्यानंतर अनेक वृत्तवाहिन्या तसेच संस्थांनी एक्झिट पोल दाखवले. या एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळणार असल्याचे दिसत आहे. त्यांना ४०० पार यावेळेस जागा मिळणार नसल्या तरीही तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्ते येऊ शकते.


एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रासाठी धक्कादायक अंदाज आहे. एनडीएला राज्यात मोठा धक्का बसू शकतो. राज्यात महायुतीला २२ जागा तसेच महाविकास आघाडीला २५ जागा मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

पंजाब सीमेवर दोन पाकिस्तानी ड्रोन बीएसएफकडून जप्त

पाकिस्तानमधून ड्रग्ज तस्करीसाठी ड्रोनचा वापर चंदीगड : सीमा सुरक्षा दलाने भारत-पाकिस्तान सीमेवर केलेल्या

ऑक्टोबरमध्ये तब्बल २१ दिवस बँका बंद

मुंबई : पुढील महिन्यातील ऑक्टोबरमध्ये देशभरातील वेगवेगळ्या बँका एकूण २१ दिवस बंद राहणार आहेत. आरबीआयच्या

करूर दुर्घटना: विजयकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २० लाख, जखमींना २ लाख मदत जाहीर

तामिळनाडूतील सभेतील चेंगराचेंगरीत ३९ जणांचा मृत्यू; राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात इतक्या मोठ्या प्रमाणात

मध्य रेल्वे प्रशासनाची मोटरमनच्या मोबाईलवर करडी नजर

रेल्वेचे नियम, बंधनांविरोधात मोटरमनची नाराजी नवी दिल्ली : मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या

लैंगिक छळाच्या आरोपाखाली फरार असलेल्या स्वामी चैतन्यांनदला आग्रा येथून अटक

नवी दिल्ली: दिल्लीतील एका व्यवस्थापन संस्थेतील विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली फरार असलेला

विजय यांच्या रॅलीत चेंगराचेंगरीमध्ये आतापर्यंत ३९ लोकांचा मृत्यू, ५० हून अधिक जखमी, मुख्यमंत्र्‍यांनी जाहीर केली मदत

करूर, तामिळनाडू: प्रसिद्ध अभिनेता आणि राजकारणी विजय यांच्या रॅलीत शनिवारी मोठी दुर्घटना घडली. करूरमध्ये आयोजित