Pune News : शनिवारवाड्यासमोर बेवारस बॅगेमुळे उडाली खळबळ!

पोलिसांसह बाॅम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल


पुणे : पुण्यात कार अपघात, गोळीबार, हल्ला अशा घटना सातत्याने उघडकीस येताना आणखी एक मोठी माहिती उघडकीस आली आहे. पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्याजवळ (Shaniwarwada) दररोज लाखो पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. आजही अनेकांना शनिवारची सुट्टी असल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत होती. मात्र अशातच या शनिवारवाड्यासमोर एक बेवारस बॅग (Abandoned Bag) आढळल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील ऐतिहासिक शनिवारवाड्यासमोर बेवारस बॅग सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. खबरदारी म्हणून संपूर्ण शनिवार वाड्यातील पर्यटकांना बाहेर काढून परिसर रिकामा करण्यात आला आहे. त्याचबरोबर पोलिसांसह बाॅम्ब शोध पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे.


दरम्यान, याप्रकरणाबाबत पोलीस आणि शोध पथकाकडून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

जमीन घोटाळा चौकशीसाठी अजित पवारांचा राजीनामा घ्या; अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना जमीन घोटाळ्याची चौकशी नीट होऊ शकेल का? असा सवाल करून मुख्यमंत्री

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीसाठी खुशखबर! "कोणी 'माईचा लाल' आला तरी...योजनेवर प्रश्नचिन्ह लावणाऱ्यांना एकनाथ शिंदेंचा सडेतोड इशारा

मुंबई : राज्य सरकारने महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केलेली 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana) महिला

शिवसेना-राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी पुन्हा टळली, मिळाली थेट पुढील वर्षाची 'डेट'

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यावरच 'अपात्रते'वर फैसला होण्याची शक्यता नवी दिल्ली

भुसावळ-महानगरी एक्सप्रेसमध्ये पाकिस्तान जिंदाबाद, आयएसआयचे संदेश

महाराष्ट्रातील सर्व रेल्वे स्थानकांवर हाय अलर्ट जारी मुंबई : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - वाराणसी

Amravati News : थरकाप उडवणारा व्हिडिओ! लग्नसोहळ्यात स्टेजवर नवरदेवावर चाकूने सपासप वार; नवरी जागीच बेशुद्ध

अमरावती : लग्न समारंभ म्हटला की, आनंद, जल्लोष आणि आयुष्यभराच्या नव्या सुरुवातीचे वातावरण असते. मात्र, अमरावती (Amravati

पंढरपूरच्या विठुरायाला भरली हुडहुडी! होळीपर्यंत असतो विठुरायाच्या हा खास पोषक

पंढरपूर : सध्या राज्यभर थंडीचा कडाका वाढत चालला आहे. आणि तापमानाचा पारा गोठत चालला आहे त्यामुळे साक्षात