Health: डायबिटीज आहे? या ४ पदार्थांपासून राहा दूर, नाही वाढणार साखर

मुंबई: भारतासह जगभरात डायबिटीज हा आजार सामान्य होत चालला आहे. डायबिटीजच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. हा आजार सायलेंट किलरसारखा आहे जो शरीराला आतून संपवतो. एकदा याच्या विळख्यात एखादा व्यक्ती सापडला तर आयुष्यभर त्याला हा आजार सोडत नाही.

तुम्हालाही जर डायबिटीज असेल तर काही पदार्थांपासून दूर राहिलेले बरे. काही असे खाद्यपदार्थ असे आहेत ज्याच्यापासून तुम्ही दूर राहून तुमची साखर नाही वाढणार.

गोड पदार्थांपासून राहा लांब


डायबिटीजच्या लोकांसाठी साखर अतिशय धोकादायक आहे. जर तुम्ही डायबिटीजचे रुग्ण आहात तर तुम्हाला साखर आणि साखरेपासून बनलेल्या गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे. मिठाई, केक, पेस्ट्री, शुगर ड्रिंक आणि इतर गोड पदार्थांपासून दूर राहिले पाहिजे.

मैद्यापासून बनवलेले पदार्थ ठरतात धोकादायक


डायबिटीज असलेल्या रुग्णांनी मैदा आणि रिफाईंड पीठापासून बनवलेले पदार्थ खाल्ले नाही पाहिजेत. यामुळे ब्लड शुगर लेव्हल वेगाने वाढते. समोसे, सफेद भात, ब्रेड, पास्ता, पिझ्झा हे पदार्थ खाऊ नयेत.

सॉफ्ट ड्रिंक्सचे मर्यादित सेवन


सॉफ्ट ड्रिंक्स आणि फ्रूट ज्यूसमध्ये मोठ्या प्रमाणात शुगर आणि कार्बोहायड्रेट असतात ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढते. द्राक्षे, संत्री, आंबा या फळांच्या रसातही शुगर असते.

तेलकट पदार्थांपासून राहा दूर


याशिवाय बटाटा, मैदा, साखरपासून बनवलेल्या ब्रेडमध्ये साखर आणि कार्बोहायड्रेट अधिक प्रमाणात असते. गोड दलिया, नॉन डेअरी मिल्क, राईस मिल्क, बदामाचे दूध आणि एनर्जी बार, रताळे यांच्या सेवनानेही ब्लड शुगर वेगाने वाढते.
Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे