तुमचा मोबाईल स्लो चार्ज होत आहे का? उन्हाळा तर नाहीये ना कारण...

मुंबई: तुमचा मोबाईल फोनही स्लो चार्ज होत आहे का? उन्हाळ्यात अनेकदा ही समस्या येते. दरम्यान, सर्व लोकांना याबाबत माहिती नसते. दरम्यान, यावेळेस भारतात मोठ्या प्रमाणात उन्हाळा जाणवत आहे. अनेक लोकांच्या मोबाईल फओनची चार्जिंग स्पीड कमी झाली आहे. काही फोनचा चार्जिंग स्पीड तर खूपच कमी झाला आहे.


एक स्मार्टफोन तेव्हाच चांगले काम करत असतो जेव्हा त्याच्या जवळपासचे तापमान सामान्य असते. जसे तापमान वाढू अथवा कमी होऊ लागते तसा फोनच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो. असेच काहीसे उन्हाळ्यात होते. बाहेरचे तापमान जेव्हा अधिक असते तेव्हा फोनवर ब्राउजिंग, कॅमेऱ्याचा वापर आणि गेम खेळल्यास हीट बाहेर निघते. यामुळे फोन खूप गरम होतो.


नवे फोन अधिक ब्राईट डिस्प्ले आणि पॉवरफुल प्रोसेसरसोबत येतात यामुळे लवकर गरम होतात. फोन गरम होताच सिस्टीम याला कूल करायला लातो. अशातच परफॉर्मन्स कमी होतो.


अशातच काही फोन चार्ज होत नाही. नव्या फोन्समध्ये असे काही फीचर्स आहेत ज्यांच्यामुळे हीट रिलीज होते. अशातच फोनमध्ये लावलेले सेन्सॉर चार्जिंग स्लो करतात. अथवा बंद करतात. यामुळे फोन थंड होईल. जसे फोन नॉर्मल होतो. तसेच चार्जिंग आधीप्रमाणे काम करायला लागते.

Comments
Add Comment

सायन प्रतीक्षा नगर येथील चार इमारती अतिधोकादायक घोषित

सायन प्रतीक्षानगर येथील म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील चार इमारती

मुंबईतील ३८८ म्हाडा पुनर्रचित इमारतींचा पुनर्विकास समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून होणार

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या

महापालिका शाळांमधील मुलांचे व्याकरण होणार अधिक मजबूत

इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांना देणार व्याकरणाची पुस्तके मुंबई (खास प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांचे भाषेच्या

मुंबई–वाढवण प्रवासाला नवे पंख; कसा असेल वाढवण बंदराशी जोडणारा उन्नत पूल?

मुंबई : मुंबई ते वाढवण बंदरापर्यंतचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दक्षिण

बिबट्याच्या दहशतीवर उपाययोजना करण्याची मागणी

मुंबई: ग्रामीण महाराष्ट्रातील बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना

पद्मभूषण सन्मानित धर्मेंद्र यांना शासकीय अंत्यसंस्कार नाहीत; खरे कारण समोर

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले असून, त्यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले