लातूर : माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra Board SSC Result) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा आज निकाल जाहीर करण्यात आला. दहावी बोर्डाचा यंदाचा निकाल ९५.८१ टक्के इतका लागला आहे. तर नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. यावर्षी दहावीच्या निकालात राज्यातील एकूण १८३ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी म्हणजे १०० पैकी १०० गुण मिळवले असून त्यामध्ये लातूरमधील १२३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही लातून जिल्ह्याने आपले अव्वल स्थान टिकवून ठेवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूर विभागीय मंडळात नांदेड, धाराशिव आणि लातूर या तीन जिल्ह्यांचा समावेश असून विभागातील १ लाख ५ हजार ७८९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यामधील १ लाख ४ हजार ५०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील एकूण ९९ हजार ५७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विभागाचा ९५.२७ टक्के निकाल लागला आहे.
दरम्यान, लातूर जिल्ह्याचा ९६.४६, धाराशिव ९५.८८, तर नांदेड जिल्ह्याचा ९३.९९ टक्के निकाल लागला आहे. बारावीपाठोपाठ दहावीच्या निकालातही विभागीय मंडळात लातूर जिल्ह्याने अव्वलस्थान मिळवल्याने लातूर पॅटर्नचा दबदबा कायम राहिला आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…