Vikas Thakre : राऊतांना नागपूरबद्दल कवडीची माहिती नाही; उगाच वायफळ बडबड करु नये!

  144

संजय राऊतांच्या नव्या दाव्यावर काँग्रेसच्या नेत्याचीच आगपाखड


नागपूर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे नेहमी आपल्या कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडतात. त्यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या भाजप नेत्यांवर आरोप करत एक नवा दावा केला. या नेत्यांनी नागपुरात नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari) पराभवाचा कट रचला होता, असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपकडून तर टीकेची झोड उठलीच पण काँग्रेसनेही (Congress) राऊतांना खडसावलं आहे. नागपुरात गडकरींच्या विरोधात उभे असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेस नेते विकास ठाकरे (Vikas Thakre) राऊतांच्या वक्तव्यामुळे पेटून उठले आहेत. 'म्हणजे तुमचा गडकरींना पाठिंबा होता का?' असा सवाल उपस्थित करत त्यांनी संजय राऊतांना लक्ष्य केलं आहे.


विकास ठाकरे म्हणाले की, मी कुणाचीही रसद घेण्याइतपत भिकार XX नाही. ९ व्यांदा निवडणूक लढतोय. तुम्हाला भाजपात भांडणं लावायचा धंदा दिलाय का? तुमचं नेमकं काम काय आहे? महाविकास आघाडीतला एक पक्ष अशाप्रकारे विधानं करत असेल तर काँग्रेसनं त्यांना समज द्यावी. मी वरिष्ठांना आज याविषयी पत्र लिहिणार आहे. हे लिहिण्यामागचा उद्देश काय, तुम्ही गडकरींच्या बाजूने होता का? अशा शब्दांत विकास ठाकरे यांनी संजय राऊतांचा दावा खोडून काढला आहे.


पुढे ते म्हणाले की, संजय राऊत जे काही बोलतात, त्यांनी पुराव्यानिशी बोलावं, उगाच वायफळ बडबड करून प्रसिद्धीसाठी बोलू नये. गडकरींबाबत त्यांचे प्रेम काय हे निवडणुकीआधी ते बोलले होते म्हणून मी कुणालाच प्रचाराला बोलावलं नाही. त्यांना भाजपाशी काय दुखणं आहे हे त्यांनी पाहावं. परंतु महाविकास आघाडीचा धर्म त्यांनी पाळायला हवा. अन्यथा आम्हाला राऊतांविरोधात बोलायला खूप बोलू शकतो असा इशारा त्यांनी दिला.


तसेच निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही गडकरींची प्रशंसा करत होते. त्यानंतर निवडणूक झाल्यावरही त्यांची प्रशंसा, गडकरींसोबत दुसरा पक्ष काढून महाविकास आघाडी करायची होती. संजय राऊतांनी बोलण्यास तारतम्य बाळगावं. नागपूरच्या विषयात त्यांना कवडीचही माहिती नाही. नागपूरची A, B, C, D ही माहिती नाही असंही विकास ठाकरेंनी सांगत उद्धव ठाकरे गटाला फटकारलं आहे.


Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित