Vikas Thakre : राऊतांना नागपूरबद्दल कवडीची माहिती नाही; उगाच वायफळ बडबड करु नये!

संजय राऊतांच्या नव्या दाव्यावर काँग्रेसच्या नेत्याचीच आगपाखड


नागपूर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे नेहमी आपल्या कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडतात. त्यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या भाजप नेत्यांवर आरोप करत एक नवा दावा केला. या नेत्यांनी नागपुरात नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari) पराभवाचा कट रचला होता, असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपकडून तर टीकेची झोड उठलीच पण काँग्रेसनेही (Congress) राऊतांना खडसावलं आहे. नागपुरात गडकरींच्या विरोधात उभे असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेस नेते विकास ठाकरे (Vikas Thakre) राऊतांच्या वक्तव्यामुळे पेटून उठले आहेत. 'म्हणजे तुमचा गडकरींना पाठिंबा होता का?' असा सवाल उपस्थित करत त्यांनी संजय राऊतांना लक्ष्य केलं आहे.


विकास ठाकरे म्हणाले की, मी कुणाचीही रसद घेण्याइतपत भिकार XX नाही. ९ व्यांदा निवडणूक लढतोय. तुम्हाला भाजपात भांडणं लावायचा धंदा दिलाय का? तुमचं नेमकं काम काय आहे? महाविकास आघाडीतला एक पक्ष अशाप्रकारे विधानं करत असेल तर काँग्रेसनं त्यांना समज द्यावी. मी वरिष्ठांना आज याविषयी पत्र लिहिणार आहे. हे लिहिण्यामागचा उद्देश काय, तुम्ही गडकरींच्या बाजूने होता का? अशा शब्दांत विकास ठाकरे यांनी संजय राऊतांचा दावा खोडून काढला आहे.


पुढे ते म्हणाले की, संजय राऊत जे काही बोलतात, त्यांनी पुराव्यानिशी बोलावं, उगाच वायफळ बडबड करून प्रसिद्धीसाठी बोलू नये. गडकरींबाबत त्यांचे प्रेम काय हे निवडणुकीआधी ते बोलले होते म्हणून मी कुणालाच प्रचाराला बोलावलं नाही. त्यांना भाजपाशी काय दुखणं आहे हे त्यांनी पाहावं. परंतु महाविकास आघाडीचा धर्म त्यांनी पाळायला हवा. अन्यथा आम्हाला राऊतांविरोधात बोलायला खूप बोलू शकतो असा इशारा त्यांनी दिला.


तसेच निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही गडकरींची प्रशंसा करत होते. त्यानंतर निवडणूक झाल्यावरही त्यांची प्रशंसा, गडकरींसोबत दुसरा पक्ष काढून महाविकास आघाडी करायची होती. संजय राऊतांनी बोलण्यास तारतम्य बाळगावं. नागपूरच्या विषयात त्यांना कवडीचही माहिती नाही. नागपूरची A, B, C, D ही माहिती नाही असंही विकास ठाकरेंनी सांगत उद्धव ठाकरे गटाला फटकारलं आहे.


Comments
Add Comment

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे