Cyclone Remal : महाराष्ट्रालाही रेमल चक्रीवादळाचा धोका? हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

  162

'या' सेवा काही तासांसाठी राहणार बंद


मुंबई : देशातील वातावरणात दिवसेंदिवस बदल होत असताना सध्या बंगालच्या उपसागरात 'रेमल' चक्रीवादळाचा (Cyclone Remal) धोका निर्माण झाला आहे. या रेमल चक्रीवादळाबाबत भारतीय हवामान विभागाने (IMD) अलर्ट जारी केला आहे. हवामानशास्त्राज्ञांच्या अंदाजानुसार रेमल चक्रीवादळ आज भारतातील काही भागात पोहोचणार असून रौद्र रुप धारण करणार आहे. त्याचबरोबर चक्रीवादळाचा धोका लक्षात घेत राज्य प्रशासनाने खबरदारीचे काही उपाय जारी केले.


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज चक्रीवादळ ताशी ११०-१२० किलोमीटर वेगाने बंगालच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रात १.५ मीटर उंचीपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच मच्छिमारांना बंगाल उपसागराच्या उत्तरेकडील भागात जाण्यास मज्जाव केला आहे. त्याशिवाय रेमलच्या प्रभावामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा, मिझोराम ते बिहारपर्यंत पावसाचा अंदाज दिला आहे.


दरम्यान, आज रात्री उशिरा हे वादळ किनारपट्टीवर धडकणार असून खबरदारी म्हणून कोलकाता विमानतळ आज दुपारी १२ ते सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत बंद असणार आहे. तर दुसरीकडे चक्रीवादळामुळे आज संध्याकाळी ६ वाजल्यापासून बंगालमधील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरातील सर्व मालवाहू आणि कंटेनर हाताळणी व्यवस्था १२ तासांसाठी बंद असणार आहे.



'या' भागात पावसाचा इशारा


हवामान विभागाकडून ओडिशाच्या बालासोर, भद्रक आणि केंद्रपारा या किनारी जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर आसाम आणि मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरामध्ये २७ आणि २८ मे रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसे कोलकाता, हावडा, नादिया आणि पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.



'रेमल' चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही धोका?


हवामान खात्याने २६-२७ मे रोजी दक्षिण २४ परगणामध्ये १०० ते ११० किमी प्रतितास आणि उत्तर २४ परगणामध्ये ताशी ९० ते १०० किमी प्रतितास ते ११० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा इशारा दिला आहे. तसेच या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.


­

Comments
Add Comment

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या