Cyclone Remal : महाराष्ट्रालाही रेमल चक्रीवादळाचा धोका? हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

'या' सेवा काही तासांसाठी राहणार बंद


मुंबई : देशातील वातावरणात दिवसेंदिवस बदल होत असताना सध्या बंगालच्या उपसागरात 'रेमल' चक्रीवादळाचा (Cyclone Remal) धोका निर्माण झाला आहे. या रेमल चक्रीवादळाबाबत भारतीय हवामान विभागाने (IMD) अलर्ट जारी केला आहे. हवामानशास्त्राज्ञांच्या अंदाजानुसार रेमल चक्रीवादळ आज भारतातील काही भागात पोहोचणार असून रौद्र रुप धारण करणार आहे. त्याचबरोबर चक्रीवादळाचा धोका लक्षात घेत राज्य प्रशासनाने खबरदारीचे काही उपाय जारी केले.


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज चक्रीवादळ ताशी ११०-१२० किलोमीटर वेगाने बंगालच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रात १.५ मीटर उंचीपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच मच्छिमारांना बंगाल उपसागराच्या उत्तरेकडील भागात जाण्यास मज्जाव केला आहे. त्याशिवाय रेमलच्या प्रभावामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा, मिझोराम ते बिहारपर्यंत पावसाचा अंदाज दिला आहे.


दरम्यान, आज रात्री उशिरा हे वादळ किनारपट्टीवर धडकणार असून खबरदारी म्हणून कोलकाता विमानतळ आज दुपारी १२ ते सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत बंद असणार आहे. तर दुसरीकडे चक्रीवादळामुळे आज संध्याकाळी ६ वाजल्यापासून बंगालमधील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरातील सर्व मालवाहू आणि कंटेनर हाताळणी व्यवस्था १२ तासांसाठी बंद असणार आहे.



'या' भागात पावसाचा इशारा


हवामान विभागाकडून ओडिशाच्या बालासोर, भद्रक आणि केंद्रपारा या किनारी जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर आसाम आणि मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरामध्ये २७ आणि २८ मे रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसे कोलकाता, हावडा, नादिया आणि पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.



'रेमल' चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही धोका?


हवामान खात्याने २६-२७ मे रोजी दक्षिण २४ परगणामध्ये १०० ते ११० किमी प्रतितास आणि उत्तर २४ परगणामध्ये ताशी ९० ते १०० किमी प्रतितास ते ११० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा इशारा दिला आहे. तसेच या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.


­

Comments
Add Comment

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना