Sindhudurga News : सिंधुदुर्ग वेंगुर्ला बोट दुर्घटनेतील चारही मृतदेह सापडले!

सात खलाशांपैकी तिघांनी पोहत किनारा गाठला मात्र चौघांचा दुर्दैवी अंत


सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्यामध्ये (Sindhudurga Vengurla) काल मासेमारी (Fishing) करणारी एक बोट उलटली. या बोटीमध्ये एकूण ७ खलाशी होते. या ७ जणांपैकी तिघांनी पोहत किनारा गाठला. मात्र, चारजण बेपत्ता होते. त्यापैकी दोघांचे मृतदेह काल सापडले तर इतर दोघांचे मृतदेह आज सापडले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, वेंगुर्ला बंदरातून रात्री मच्छिमारांना लागणारी बर्फाची वाहतूक सुरू असताना ही दुर्घटना घडली. काल रात्री हे सर्वजण मच्छीमारीसाठी लागणारा बर्फ घेऊन बोटीतून निघाले होते. मात्र, अचानक सुरु झालेल्या वादळी वार्‍यामुळे ही बोट हेलकावे खात पाण्यात बुडाली. ७ मच्छीमारांपैकी तिघांनी पोहून किनारा गाठल्याने ते बचावले. मात्र इतर चौघांचा मृत्यू झाला.


मृ झालेल्या खलाशांपैकी एक खलाशी रत्नागिरीतील तर तीन खलाशी मध्यप्रदेशातील होते. आझाद मुनीलाल कोल, चांद गुलाल महमद, शिवराम कोल हे तिघे मध्य प्रदेशातील तर महादेव शंकर आंबेरकर हा मूळचा रत्नागिरीचा होता. हे सर्व खलाशी वेंगुर्ले येथे मासेमारी बोटीवर कामाला होते.



महाराष्ट्रात या आठवड्यात १० दुर्घटना; तर ४० जणांचा अंत


महाराष्ट्रात या आठवड्यात १० दुर्घटना घडल्या असून यात ४० निष्पापांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये बोट पलटून मृत्यू झाल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. सिंधुदुर्गात चौघांचा, उजनीत सहा आणि प्रवरा नदीत एसडीआरएफची बोट उलटल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. बोट पलटून तब्बल १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच डोंबीवली एमआयडीसी दुर्घटनेतील मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

नेमक्या कोणत्या कारणामुळे पार्थ पवारांच्या अडचणी वाढल्या ?

पुणे : कोरेगाव पार्क परिसरातील महार वतनाच्या तब्बल ४० एकर जमिनीच्या नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर

पुणेकरांनो नव्या घराचं स्वप्न होणार पूर्ण; म्हाडाच्या ४,१८६ घरांसाठी अर्ज करण्याची मुदत आता ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवली

पुणे : पुणे महानगर प्रदेशात घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाने (MHADA) मोठा दिलासा दिला आहे. विविध

मालेगावच्या बालिकेवर अत्याचार, सर्वत्र संताप; अभिनेत्री सुरभी भावेकडून कठोर शिक्षेची मागणी

मालेगाव : मालेगावजवळील डोंगराळे गावात घडलेल्या निर्घृण घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. साडेतीन

राज्यभरातील व्यापाऱ्यांचा ५ डिसेंबरला लाक्षणिक बंद

पुणे (प्रतिनिधी) : राज्यभरातील व्यापारी विविध मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ५ डिसेंबर २०२५ रोजी

धक्कादायक प्रकार, पुण्यात १६ जेष्ठ नागरिकांना उघड्यावर टाकले

पुणे : पुण्यातील सामाजिक सुरक्षेच्या यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. शहरातील १६

ताकझुरे अर्बन निधी लिमिटेड संस्थेत घोटाळा! सर्वसामान्यांच्या बचतीचा पदाधिकाऱ्यांनी घेतला फायदा

अकोला: अकोल्यातली ताकझुरे अर्बन निधी लिमिटेड या संस्थेमध्ये ठेवी केलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक