Nashik IT Raid : नाशिकच्या सराफा व्यापार्‍यांमध्ये खळबळ! आयकर विभागाने टाकल्या धाडी

  106

अधिकार्‍यांकडून व्यापार्‍यांची दुकाने आणि घरांची तपासणी


नाशिक : नाशिकमधील (Nashik) काही सराफा व्यावसायिकांवर आयकर विभागाने अचानक धाडी (Income Tax Raid) टाकल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर (Canada Corner Nashik) भागातील सुरणा ज्वेलर्स तसेच त्यांच्या निवासस्थानावर आणि इतर ठिकाणी अधिकाऱ्यांची तपासणी सुरू आहे. आयकर विभागाकडून व्यावसायिकांच्या घरांची आणि दुकानांचीही तपासणी केली जात आहे.


हे व्यावसायिक सोने चांदीच्या दागिन्यांच्या व्यवहारांची माहिती लपवत असल्याचा आयकर विभागाला संशय आहे, त्यातूनच या धाडी टाकण्यात आल्या आहेत. आयकर विभागाच्या दोन पथकांकडून शहरातील सराफ व्यावसायिकांची चौकशी सुरू आहे. तब्बल ३९ वाहनांमध्ये आयकर विभागाचे अधिकारी आल्याची माहिती आहे.


मागील काही दिवसांपासून राज्यात आयकर विभागामार्फत विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. आज नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागात छापेमारी केली जात आहे. सकाळपासून ही कारवाई सुरू असल्याची माहिती आहे. नाशिकमध्ये आयकर विभागाची ही एक मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे. आता या कारवाईत पुढे काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या