Jalgaon news : जळगावमध्ये तीव्र उष्णतेमुळे गव्हाच्या पोत्याने भरलेला ट्रक पेटला!

तापमान ४४ अंश सेल्सियसवर गेल्याने घडली दुर्घटना


जळगाव : राज्यभरात सूर्य आग ओकत असून उन्हाचा तीव्र तडाखा (Intense heat) बसत आहे. काही भागांमध्ये पावसाच्या सरी बरसत असल्या तरी उन्हाची समस्या कायम आहे. मराठवाड्यासह विदर्भात तर तापमानात प्रचंड वाढ झाल्याने पाणीटंचाईची समस्याही भेडसावत आहे. धुळे (Dhule), जळगावमध्ये (Jalgaon) उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. या जिल्ह्यांत तापमान ४४ अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. यामुळेच जळगावमध्ये उन्हाच्या तडाख्याने एका ट्रकला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली.


जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची मोठी लाट पसरली आहे. जळगावातील जामनेर तालुक्यात भवानी माथाजवळ जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर अचानक एका ट्रकने पेट घेतला. या ट्रकमधून गव्हाच्या पोत्यांची वाहूतक करण्यात येत होती. या घटनेनंतर अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले, मात्र अग्निशमनचे बंब येईपर्यंत ट्रकचे जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. गव्हाच्या पोत्यांचेही नुकसान झाले आहे.


या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा उष्णतेची लाट आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे, नागरिकांनी दुपारच्या प्रहरात अनावश्यक घराबाहेर न पडण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला