Jalgaon news : जळगावमध्ये तीव्र उष्णतेमुळे गव्हाच्या पोत्याने भरलेला ट्रक पेटला!

तापमान ४४ अंश सेल्सियसवर गेल्याने घडली दुर्घटना


जळगाव : राज्यभरात सूर्य आग ओकत असून उन्हाचा तीव्र तडाखा (Intense heat) बसत आहे. काही भागांमध्ये पावसाच्या सरी बरसत असल्या तरी उन्हाची समस्या कायम आहे. मराठवाड्यासह विदर्भात तर तापमानात प्रचंड वाढ झाल्याने पाणीटंचाईची समस्याही भेडसावत आहे. धुळे (Dhule), जळगावमध्ये (Jalgaon) उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. या जिल्ह्यांत तापमान ४४ अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. यामुळेच जळगावमध्ये उन्हाच्या तडाख्याने एका ट्रकला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली.


जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची मोठी लाट पसरली आहे. जळगावातील जामनेर तालुक्यात भवानी माथाजवळ जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर अचानक एका ट्रकने पेट घेतला. या ट्रकमधून गव्हाच्या पोत्यांची वाहूतक करण्यात येत होती. या घटनेनंतर अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले, मात्र अग्निशमनचे बंब येईपर्यंत ट्रकचे जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. गव्हाच्या पोत्यांचेही नुकसान झाले आहे.


या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा उष्णतेची लाट आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे, नागरिकांनी दुपारच्या प्रहरात अनावश्यक घराबाहेर न पडण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी