Mumbai Railway : रेल्वे प्रवाशांनो, लक्ष द्या! पश्चिम मार्गावर दोन दिवस मेगाब्लॉक

  99

'या' रेल्वे गाड्या रद्द


मुंबई : विरार-डहाणु मार्गातील वैतरणा नदीवर आणखी एक पुल बांधण्यात येत आहे. यासाठी स्टील गर्डर बसवण्याचे काम सुरू असल्यामुळे पश्चिम रेल्वेने दोन दिवस मेगाब्लॉक घोषित केला आहे. यामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार असून प्रवाशांचा खोळंबा होणार आहे. त्याचबरोबर या मेगाब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील काही ट्रेनला फटका बसणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.


पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, विरार-डहाणु मार्गादरम्यान वैतरणा नदीच्या जवळ स्टील गर्डर बसवण्याचे काम सुरू आहे. यामुळे विरार-वैतरणा सेक्शनमधील पुल क्रमांक ९० वरील पीएससी स्लॅब बदलण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. पुढील दोन दिवस म्हणजेच गुरुवारी २४ मे रोजी रात्री १०.५० वाजल्यापासून ते शुक्रवारी २५ मे रोजी पहाटे ४.५० पर्यंत असणार आहे. यादरम्यान, पश्चिम रेल्वेच्या काही गाड्या रद्द केल्या असून काही गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत. तर काही रेल्वेगाड्या कमी अंतरापर्यंत चालवल्या जाणार आहेत.



'या' गाड्या असणार रद्द


२४ मे रोजी रात्री ९.२० वाजता विरारहून सुटणारी विरार-डहाणू आणि १०.४५ वाजता डहाणू मार्गावरुन सुटणारी विरार लोकल रद्द राहणार आहे.




'या' गाड्या अंशतः रद्द



  • ट्रेन क्र १९४२६ नंदुरबार-बोरिवली एक्स्प्रेस बोईसरपर्यंतच धावेल. बोईसर आणि बोरिवली स्थानकादरम्यान अंशतः रद्द केली जाणार आहे.

  • ट्रेन क्र ०९०९९० संजन-विरार MEMU डहाणू रोडपर्यंत धावेल आणि डहाणू रोड आणि विरार स्थानकादरम्यान अंशतः रद्द करण्यात येणार आहे.

  • ट्रेन क्र ०९०८९ विरार-संजन मेमू विरार आणि वाणगाव स्थानकादरम्यान अंशत रद्द केली जाणार आहे. दरम्यान वाणगाव रोड ते संजन दरम्यान धावेल.

  • ट्रेन क्र ०९१८० सुरत-विरार पॅसेंजर डहाणू रोडपर्यंतच धावणार आहे. डहाणू रोड आणि विरार स्थानकादरम्यान अंशत रद्द केली जाणार आहे.

  • ट्रेन क्र १९१०१ विरार-भरुच पॅसेंजर विरार डहाणू रोड स्थानकादरम्यान अंशत रद्द राहील. तसंच, डहाणू रोड आणि भरूच स्थानकादरम्यान धावेल.



Comments
Add Comment

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना

मरिनड्राईव्हच्या समुद्रात तरुणीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा

मुंबईत यंदा २७५ कृत्रिम तलावांची निर्मिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून

समुद्र किनाऱ्यांची कचऱ्यातून सुटका

मुसळधार पावसामुळे चौपाट्यांवर पसरलेला कचरा साफ मागील नऊ दिवसांमध्ये ९५० मेट्रीक टन कचऱ्याची लावली