Mumbai Railway : रेल्वे प्रवाशांनो, लक्ष द्या! पश्चिम मार्गावर दोन दिवस मेगाब्लॉक

  89

'या' रेल्वे गाड्या रद्द


मुंबई : विरार-डहाणु मार्गातील वैतरणा नदीवर आणखी एक पुल बांधण्यात येत आहे. यासाठी स्टील गर्डर बसवण्याचे काम सुरू असल्यामुळे पश्चिम रेल्वेने दोन दिवस मेगाब्लॉक घोषित केला आहे. यामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार असून प्रवाशांचा खोळंबा होणार आहे. त्याचबरोबर या मेगाब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील काही ट्रेनला फटका बसणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.


पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, विरार-डहाणु मार्गादरम्यान वैतरणा नदीच्या जवळ स्टील गर्डर बसवण्याचे काम सुरू आहे. यामुळे विरार-वैतरणा सेक्शनमधील पुल क्रमांक ९० वरील पीएससी स्लॅब बदलण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. पुढील दोन दिवस म्हणजेच गुरुवारी २४ मे रोजी रात्री १०.५० वाजल्यापासून ते शुक्रवारी २५ मे रोजी पहाटे ४.५० पर्यंत असणार आहे. यादरम्यान, पश्चिम रेल्वेच्या काही गाड्या रद्द केल्या असून काही गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत. तर काही रेल्वेगाड्या कमी अंतरापर्यंत चालवल्या जाणार आहेत.



'या' गाड्या असणार रद्द


२४ मे रोजी रात्री ९.२० वाजता विरारहून सुटणारी विरार-डहाणू आणि १०.४५ वाजता डहाणू मार्गावरुन सुटणारी विरार लोकल रद्द राहणार आहे.




'या' गाड्या अंशतः रद्द



  • ट्रेन क्र १९४२६ नंदुरबार-बोरिवली एक्स्प्रेस बोईसरपर्यंतच धावेल. बोईसर आणि बोरिवली स्थानकादरम्यान अंशतः रद्द केली जाणार आहे.

  • ट्रेन क्र ०९०९९० संजन-विरार MEMU डहाणू रोडपर्यंत धावेल आणि डहाणू रोड आणि विरार स्थानकादरम्यान अंशतः रद्द करण्यात येणार आहे.

  • ट्रेन क्र ०९०८९ विरार-संजन मेमू विरार आणि वाणगाव स्थानकादरम्यान अंशत रद्द केली जाणार आहे. दरम्यान वाणगाव रोड ते संजन दरम्यान धावेल.

  • ट्रेन क्र ०९१८० सुरत-विरार पॅसेंजर डहाणू रोडपर्यंतच धावणार आहे. डहाणू रोड आणि विरार स्थानकादरम्यान अंशत रद्द केली जाणार आहे.

  • ट्रेन क्र १९१०१ विरार-भरुच पॅसेंजर विरार डहाणू रोड स्थानकादरम्यान अंशत रद्द राहील. तसंच, डहाणू रोड आणि भरूच स्थानकादरम्यान धावेल.



Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.